Wednesday, 10 January 2018

देशातील पहिले Railway Engineering College सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील जमगाव येथे आहे

देशातील पहिले Railway Engineering College

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील जमगाव येथे आहे


सोलापूर येथे भारतीय रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटरचे पहिले कॉलेज सुरू

MAEERs पुणे, 22 एप्रिल (पीएसआय) शहर आधारित मेयर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स शैक्षणिक वर्षापासून 2017-18 पासून भारतातील पहिले रेल्वे इंजिनियरिंग कॉलेज सुरू केले आहे  एमईईईआरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी सांगितले. ते म्हणाले की, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा अभ्यासक्रम रेल्वे प्रणाली नियोजन, रेल्वे यासारख्या विषयांचा समावेश आहे  पायाभूत सुविधा आणि रेल्वे ऑपरेशन्स या शाखेत सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार, संगणक, औद्योगिक व उत्पादन यांचा समावेश आहे . 

भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणण्याची क्षमता रेल्वे सिस्टिम इंजिनिअरिंग एक अतिशय महत्वाची बाब आहे, असेही त्यांनी सांगितले. या संस्थेने या दिशेने योगदान दिले आहे. भारतीय रेल्वेची गरज आहे उच्च पदवीधारक, पदव्युत्तर पदवीधर, पीएचडी धारक आणि संशोधक आणि एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंगचे त्यासाठी एक माध्यम आहे. देश आणि त्याची प्रचंड लोकसंख्या लक्षात घेता, भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण करणे ही एक जलद प्रक्रिया असणे आवश्यक आहे. उच्च गतीतील इंजिन, रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता आणि रेल्वे तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण आणि अभियांत्रिकीचा प्रवास कमीतकमी करणे आवश्यक आहे. त्या दिशेने, 

रेल्वे सिस्टिम अभियांत्रिकीला प्रचंड विकासाची गरज आहे आणि ते केवळ उच्च प्रशिक्षित व कुशल असलेल्याच शक्य आहे रेल्वे अभियंते, डॉ. कराड यांनी सांगितले. "दुर्दैवाने, भारतीय रेल्वेची सुरूवात ब्रिटीश राज्यात झाली, ती अपेक्षित वेगाने विकसित झाली नाही.भारतीय अभियांत्रिकी वगैरे रेल्वे इंजिनियरिंगवर जोरदार भर आहे आणि जगभरात सर्वत्र गांभीर्याने घेतले जात आहे .चीनमध्ये 80 पेक्षा अधिक अभ्यासक्रम आहेत जे देशभरात चालवले जातात.

 रेल्वे इंजिनिअरिंगमध्ये ही भारतातील अतिशय दुर्दैवी स्थिती आहे की आम्हाला अद्यापही या क्षेत्रात पदवी मिळत नाही. " जागतिक तंत्रज्ञानाच्या आधारावर भारतातील रेल सिस्टम्स विकसित करण्याची गरज आहे, एमआयटी कॉलेज ऑफ रेलवे इंजिनीअरिंग अँड रिसर्चने त्यांना समजावून सांगितले आहे. या महाविद्यालयातून पारित होणार्या अभियंत्यांना संबंधित क्षेत्रात भरपूर करिअर आणि संशोधन संधींचा सामना करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.



माहिती आवडल्यास आमचे Facebook Page Like करा

Tuesday, 9 January 2018

पहा छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली एक सुंदर व्याख्या



पहा छत्रपती  शिवाजी महाराजांची केलेली एक सुंदर व्याख्या



Friday, 5 January 2018

सिपना शोध यात्रा (शिबिर) वृत्त

सिपना शोध यात्रा (शिबिर) वृत्त

६ वर्षापासून सातत्याने चालणारी सिपना शोध यात्रा यावर्षी नेहमीप्रमाणे २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर ग्रामग्यानपीठ , कोठा , मेळघाट येथे संप्पन झाली.

पुण्यातील COEP येथील NSS च्या ४० विद्यार्थी व विद्यार्थीनीनी डाॕ.हिरेमठ व प्रा.चौधरी यांच्या पुढाकाराने  प्रा.खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वेदपाठक व पोतदार सर यांच्या उपस्थितीत यात भाग घेतला होता.
मेळघाट सपोर्ट ग्रुपचे श्री.नागेश माटनवर या सर्वांची काळजी घ्यायला होतेच.

दिनांक २४ रात्री पुण्याहून निघालेली टीम २५ दुपारी तेथे पोचली. त्या दिवशी ग्रामग्यानपीठ बघणे व तेथील परीसराची माहिती घेण्यात आली. संध्याकाळी
शिबिराची सुरवात  झाली. पुणे व्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर ठिकाणाहून बरेच जण या शिबिराला सहभागी झाले होते. रोज ७० ते ७५ जणांचा सहभाग होता.

 

२६ डिसेंबर -  सकाळी जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळ नागपूर चेतन खंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. भारतीताई कालबांडे व श्री. अशोक बेलसरे यांचे योग प्रात्यक्षिके व माहिती असे सत्र झाले.
त्यानंतर ११ ते २ श्रमदान -  तळे तयार करण्याचे.
संध्याकाळी भूसंपदेचा अभ्यास शेतावर जाऊन केला गेला व सिपना वार्ता मधे आजच्या दिवसाचा आढावा घेण्यात आला

SHRAMDAN
SHRAMDAN

 २७ डिसेंबर
योगासने
प्रार्थना
श्रमदान
व वनसंपदेचा अभ्यास जंगलात भ्रमण करुन केला गेला
त्यादिवशी विदर्भ प्रगेलास प्रचारक श्री.प्रसाद महानकर यांनी सेवा व संघटन या विषयाअंतर्गत सत्र घेतले व मुलांशी गप्पा मारल्या

विज्ञान आश्रम पाबळ पुणे येथील श्री.योगेश कुलकर्णी यांचे अनुभव कथन झाले

२८ डिसेंबर
निरुपमाताईंनी योगासने
प्रार्थना
श्रमदान
नभसंपदेचा अभ्यास बोरी तलावावर जाऊन केला गेला
त्यादिवशी वनवासी कल्याण आश्रमाचे महेशजी काळे यांचे समाज व सामाजिक काम या विषयावर सत्र झाले.

रूषीकेश खिल्लारेंचे हुनर खोजयात्रा अनुभव कथन झाले

२९ डिसेंबर
योगासने
प्रार्थना
पशू संपदेचा अभ्यास पाणवठ्यवर व जंगलात जाऊन केला
सिपना परीसर माहीती सुनीलजींनी सांगितली.
तसेच निरुपमाजींनी संपूर्ण बांबू केन्द्राचे काम व त्यांना व सुनीलजींना गेली २४ वर्षे आलेले विविध अनुभव सांगितले.
तसेच त्या दिवशी बांबू पासून तेल कसे काढतात त्याचे प्रात्यक्षिक सुनीलजींनी करुन दाखविले.
या तेलाचे testing Coep मधे केले जाणार आहे.

३० डिसेंबर
सकाळीच ६.३० ला सिपना नदी परीक्रमा चालू झाली.
जलसंपदेचा अभ्यास नदी भ्रमण करुन
नदीतीरावरील सर्व संपदांचा अभ्यास एकीकडे करत व बाजीराव व तेथील माहीतगार कोरकू समाजातील मंडळी सोबत होतीच.
निसर्ग रम्य परीसरात वनभोजन तेथील नदीचेच प्यायला गार पाणी.
परत परीक्रमा चालू.

संध्याकाळी सिपना देवीची प्रतिकृती घेऊन सिपना नदीवरील गाणे गात वाद्यांच्या गजरात ग्रामग्यानपीठावरुन निघालो सिपना नदीची आरती करण्यास व दीपदान करण्यास
६.३० वाजता परीक्रमा करणारे देखील त्या ठिकाणी पोचले.
तेथील स्थानिक महाराज व नदीविषयी माहीती असणारे व आस्था असणारे भगवान बाबा यांनी या आरतीचे जनजागृती करण्याकरीता असलेले महत्व सांगितले.

सुनीलजींनी नदीची परंपरा व नदीवर केलेले गाणे म्हटले.
२०० च्यावर दिप मिळून ॐ तयार केला होता.

नागपूरचे कार्यकर्ते  श्री.सतीश देशमुख दाम्पत्य यांनी सिपना नदीची पूजा केली.

त्यानंतर सिपना नदी देवीची आरती करण्याची संधी सुनीलजींनी मला व रसिकाला दिली.

त्यानंतर ॐ आकारातले दिप पेटविण्यात आले.

व जमलेल्या सर्व समुदायाने हे दिप पाण्यात दान केले.
विहंगम दृश्य , सिपनामय झालेले सगळ्यांचे मन ह्या सोहळ्याचे वर्णन शब्दात न सांगता येण्यासारखे

३१ डिसेंबर
योगासने व प्रार्थना होऊन
पाणी विषयातील ओलावा फाऊंडेशन चे श्री.अरविंद कडबे यांचे सत्र झाले.

सर्व मुलांनी ४ दिवसात आजूबाजूच्या परीसरात जाऊन केलेला परीसंवाद व सर्व भूसंपदाचा अभ्यास या सर्वाची पावती म्हणजे त्या दिवशी भरलेली " सिपना पंचायत." म्हणजेच जनसंपदेचा अभ्यास.
या पंचायतीस कोठा , चित्री , लवादा , राणामालूज व हरीसाल येथून गावकरी आले होते.

सिपना पंचायत पूर्ण सांगाण्याकरीता वेगळा लेख लिहावयास लागेल.
या पंचायतीत प्रमुखपणे बसलेले
- गावचे आडा पाटील
- कारागीर समाजाचे प्रतिनीधी
- तंटामुक्ती अध्यक्ष
- पंचक्रोशी प्रतीनिधी - बाजीराव
- COEP NSS प्रतिनीधी -
मेळघाट सपोर्ट ग्रुप प्रतिनीधी - राजेश गुर्जर
-  सर्वांचे मार्गदर्शक  सुनीलजी

या पंचायतीत खटावकर सर यांच्या नेतृत्वाखाली मुलांनी केलेला सर्व संपदांचा अभ्यास मांडला

समाजातील चालीरीती व त्यावर चर्चा झाली.

कोठा या गावाने केलेली दारुबंदी मोहीम

गावात दर आठवड्याला चालणारे उत्स्फूर्त स्वच्छता अभियान

गावातील काहीजणांनी शोषखड्डा प्रयोग व त्यावर अजून चांगल्या प्रकारे तो कसा राबवता येईल हे civil च्या विद्यार्थ्यांनी पोतदार सरांबरोबर केलेला अभ्यास

गावात गोबर गॕस असावा व तो चालविण्याची सर्व गावकरी यांची इच्छा

असे अनेक विषयावर संभाषण झाले.
गोबर गॕस व शोषखड्ड्याची गरज यावर सर्वांनी ठराव केले.

आगामी वर्षात यावर तेथे COEP , मेळघाट सपोर्ट ग्रुप व सेवावर्धिनी काम करेल.

हे शिबिर संप्पन होण्यामागे सुनीलजी व निरुपमाजींनी ऊभा केलेला संपूर्ण बांबू केन्द्राचा कार्यकर्ता संच व त्यांचे परीश्रम
प्रकाश , बाजीराव , सहदेव , चंदा , भुरेलाल अजून नावे पटकन तोंडावर नाहीत पण चेहरा माहीत असलेले अनेकजण

NSS शिबिरातील सर्व मुलामुलींचे श्रम

हे सर्व सैन्य पोटावर चालवले ती टीम सुखदेव गायन ,नंदलाल जावरकर ,  गोरेलाल , कोठा गावच्या चार भगिनी व संगीताताई न्यायाधीश यांना विसरणे शक्य नाही. बरेच शहरात न मिळणारे गावरान चविष्ठ पदार्थ खायला मिळाले

संपूर्ण बांबू केन्द्राचे  अमरावतीमधील सतीश विश्वकर्मा , तसेच श्री.मालपाणी , पुण्यातील एक खाजगी शाळा चालविणारे श्री.राजेश , तसेच औरंगाबाद येथील सुवर्णाताई आम्ही सर्व मेळघाट सपोर्ट ग्रुपचे असे अनेकजण या शिबिराकरीता आलेले होते. व प्रत्येकजण आपल्या आपल्या ठिकाणाहून मेळघाटातील या बांधवांकरीता काय करता येईल व त्यांच्याकडून काय शिकता येईल याचा अनुभव घेऊन निघालो परत येण्याच्या इराद्यानेच .......

मेळघाट सपोर्ट ग्रुप पुणे


NSS CAMP 2017

सिपना शोध यात्रा (शिबिर) वृत्त

६ वर्षापासून सातत्याने चालणारी सिपना शोध यात्रा यावर्षी नेहमीप्रमाणे २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर ग्रामग्यानपीठ , कोठा , मेळघाट येथे संप्पन झाली.

पुण्यातील COEP येथील NSS च्या ४० विद्यार्थी व विद्यार्थीनीनी डाॕ.हिरेमठ व प्रा.चौधरी यांच्या पुढाकाराने  प्रा.खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वेदपाठक व पोतदार सर यांच्या उपस्थितीत यात भाग घेतला होता.
मेळघाट सपोर्ट ग्रुपचे श्री.नागेश माटनवर या सर्वांची काळजी घ्यायला होतेच.

दिनांक २४ रात्री पुण्याहून निघालेली टीम २५ दुपारी तेथे पोचली. त्या दिवशी ग्रामग्यानपीठ बघणे व तेथील परीसराची माहिती घेण्यात आली. संध्याकाळी
शिबिराची सुरवात  झाली. पुणे व्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर ठिकाणाहून बरेच जण या शिबिराला सहभागी झाले होते. रोज ७० ते ७५ जणांचा सहभाग होता.

 

२६ डिसेंबर -  सकाळी जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळ नागपूर चेतन खंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. भारतीताई कालबांडे व श्री. अशोक बेलसरे यांचे योग प्रात्यक्षिके व माहिती असे सत्र झाले.
त्यानंतर ११ ते २ श्रमदान -  तळे तयार करण्याचे.
संध्याकाळी भूसंपदेचा अभ्यास शेतावर जाऊन केला गेला व सिपना वार्ता मधे आजच्या दिवसाचा आढावा घेण्यात आला

 २७ डिसेंबर
योगासने
प्रार्थना
श्रमदान
व वनसंपदेचा अभ्यास जंगलात भ्रमण करुन केला गेला
त्यादिवशी विदर्भ प्रगेलास प्रचारक श्री.प्रसाद महानकर यांनी सेवा व संघटन या विषयाअंतर्गत सत्र घेतले व मुलांशी गप्पा मारल्या

विज्ञान आश्रम पाबळ पुणे येथील श्री.योगेश कुलकर्णी यांचे अनुभव कथन झाले

२८ डिसेंबर
निरुपमाताईंनी योगासने
प्रार्थना
श्रमदान
नभसंपदेचा अभ्यास बोरी तलावावर जाऊन केला गेला
त्यादिवशी वनवासी कल्याण आश्रमाचे महेशजी काळे यांचे समाज व सामाजिक काम या विषयावर सत्र झाले.

रूषीकेश खिल्लारेंचे हुनर खोजयात्रा अनुभव कथन झाले

२९ डिसेंबर
योगासने
प्रार्थना
पशू संपदेचा अभ्यास पाणवठ्यवर व जंगलात जाऊन केला
सिपना परीसर माहीती सुनीलजींनी सांगितली.
तसेच निरुपमाजींनी संपूर्ण बांबू केन्द्राचे काम व त्यांना व सुनीलजींना गेली २४ वर्षे आलेले विविध अनुभव सांगितले.
तसेच त्या दिवशी बांबू पासून तेल कसे काढतात त्याचे प्रात्यक्षिक सुनीलजींनी करुन दाखविले.
या तेलाचे testing Coep मधे केले जाणार आहे.

३० डिसेंबर
सकाळीच ६.३० ला सिपना नदी परीक्रमा चालू झाली.
जलसंपदेचा अभ्यास नदी भ्रमण करुन
नदीतीरावरील सर्व संपदांचा अभ्यास एकीकडे करत व बाजीराव व तेथील माहीतगार कोरकू समाजातील मंडळी सोबत होतीच.
निसर्ग रम्य परीसरात वनभोजन तेथील नदीचेच प्यायला गार पाणी.
परत परीक्रमा चालू.

संध्याकाळी सिपना देवीची प्रतिकृती घेऊन सिपना नदीवरील गाणे गात वाद्यांच्या गजरात ग्रामग्यानपीठावरुन निघालो सिपना नदीची आरती करण्यास व दीपदान करण्यास
६.३० वाजता परीक्रमा करणारे देखील त्या ठिकाणी पोचले.
तेथील स्थानिक महाराज व नदीविषयी माहीती असणारे व आस्था असणारे भगवान बाबा यांनी या आरतीचे जनजागृती करण्याकरीता असलेले महत्व सांगितले.

सुनीलजींनी नदीची परंपरा व नदीवर केलेले गाणे म्हटले.
२०० च्यावर दिप मिळून ॐ तयार केला होता.

नागपूरचे कार्यकर्ते  श्री.सतीश देशमुख दाम्पत्य यांनी सिपना नदीची पूजा केली.

त्यानंतर सिपना नदी देवीची आरती करण्याची संधी सुनीलजींनी मला व रसिकाला दिली.

त्यानंतर ॐ आकारातले दिप पेटविण्यात आले.

व जमलेल्या सर्व समुदायाने हे दिप पाण्यात दान केले.
विहंगम दृश्य , सिपनामय झालेले सगळ्यांचे मन ह्या सोहळ्याचे वर्णन शब्दात न सांगता येण्यासारखे

३१ डिसेंबर
योगासने व प्रार्थना होऊन
पाणी विषयातील ओलावा फाऊंडेशन चे श्री.अरविंद कडबे यांचे सत्र झाले.

सर्व मुलांनी ४ दिवसात आजूबाजूच्या परीसरात जाऊन केलेला परीसंवाद व सर्व भूसंपदाचा अभ्यास या सर्वाची पावती म्हणजे त्या दिवशी भरलेली " सिपना पंचायत." म्हणजेच जनसंपदेचा अभ्यास.
या पंचायतीस कोठा , चित्री , लवादा , राणामालूज व हरीसाल येथून गावकरी आले होते.

सिपना पंचायत पूर्ण सांगाण्याकरीता वेगळा लेख लिहावयास लागेल.
या पंचायतीत प्रमुखपणे बसलेले
- गावचे आडा पाटील
- कारागीर समाजाचे प्रतिनीधी
- तंटामुक्ती अध्यक्ष
- पंचक्रोशी प्रतीनिधी - बाजीराव
- COEP NSS प्रतिनीधी -
मेळघाट सपोर्ट ग्रुप प्रतिनीधी - राजेश गुर्जर
-  सर्वांचे मार्गदर्शक  सुनीलजी

या पंचायतीत खटावकर सर यांच्या नेतृत्वाखाली मुलांनी केलेला सर्व संपदांचा अभ्यास मांडला

समाजातील चालीरीती व त्यावर चर्चा झाली.

कोठा या गावाने केलेली दारुबंदी मोहीम

गावात दर आठवड्याला चालणारे उत्स्फूर्त स्वच्छता अभियान

गावातील काहीजणांनी शोषखड्डा प्रयोग व त्यावर अजून चांगल्या प्रकारे तो कसा राबवता येईल हे civil च्या विद्यार्थ्यांनी पोतदार सरांबरोबर केलेला अभ्यास

गावात गोबर गॕस असावा व तो चालविण्याची सर्व गावकरी यांची इच्छा

असे अनेक विषयावर संभाषण झाले.
गोबर गॕस व शोषखड्ड्याची गरज यावर सर्वांनी ठराव केले.

आगामी वर्षात यावर तेथे COEP , मेळघाट सपोर्ट ग्रुप व सेवावर्धिनी काम करेल.

हे शिबिर संप्पन होण्यामागे सुनीलजी व निरुपमाजींनी ऊभा केलेला संपूर्ण बांबू केन्द्राचा कार्यकर्ता संच व त्यांचे परीश्रम
प्रकाश , बाजीराव , सहदेव , चंदा , भुरेलाल अजून नावे पटकन तोंडावर नाहीत पण चेहरा माहीत असलेले अनेकजण

NSS शिबिरातील सर्व मुलामुलींचे श्रम

हे सर्व सैन्य पोटावर चालवले ती टीम सुखदेव गायन ,नंदलाल जावरकर ,  गोरेलाल , कोठा गावच्या चार भगिनी व संगीताताई न्यायाधीश यांना विसरणे शक्य नाही. बरेच शहरात न मिळणारे गावरान चविष्ठ पदार्थ खायला मिळाले

संपूर्ण बांबू केन्द्राचे  अमरावतीमधील सतीश विश्वकर्मा , तसेच श्री.मालपाणी , पुण्यातील एक खाजगी शाळा चालविणारे श्री.राजेश , तसेच औरंगाबाद येथील सुवर्णाताई आम्ही सर्व मेळघाट सपोर्ट ग्रुपचे असे अनेकजण या शिबिराकरीता आलेले होते. व प्रत्येकजण आपल्या आपल्या ठिकाणाहून मेळघाटातील या बांधवांकरीता काय करता येईल व त्यांच्याकडून काय शिकता येईल याचा अनुभव घेऊन निघालो परत येण्याच्या इराद्यानेच .......

मेळघाट सपोर्ट ग्रुप पुणे

मा. खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस पहा त्यांचा जीवन प्रवास

#महाराष्ट्राचे_सुपुत्र

#आ_शरद_पवार_साहेब_यांच्या_वाढदिवसा_निमित्ताने

#थोडक्यात_कर्तृत्व_परिचय


पवारांचा जन्म डिसेंबर १२, इ.स. १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. इ.स. १९५६ साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली.त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.


इ.स. १९६६ साली पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली.त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला.


#विधानसभा:


सर्वप्रथम इ.स. १९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या २९व्या वर्षी झाला. इ.स. १९७२ आणि इ.स. १९७८ सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले. इ.स. १९७८ सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हेसुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते. पण काँग्रेस पक्षाचे १२ आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले. त्यानंतर 'पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला' अशी जळजळीत प्रतिक्रिया वसंतरावांनी दिली व १९७८ ला शरद पवार यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री करण्यात सहकार महर्षी केशवराव सोनवणे यांचे फार मोठे योगदान होते याची त्यांनी आठवण ठेवली नाही.


#मुख्यमंत्री :


१८ जुलै इ.स. १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले.ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. इ.स. १९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून इ.स. १९८० मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस(इंदिरा) पक्षाने २८८ पैकी १८६ जागा जिंकल्या आणि बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.


#लोकसभा :


इ.स. १९८४ सालची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील ४८ पैकी केवळ ५ जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता .मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले. मार्च इ.स. १९८५ ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस(स) पक्षाने २८८ पैकी ५४ जागा जिंकल्या आणि पवार राज्यविधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.


#परत_विधानसभा:


इ.स. १९८७ साली ९ वर्षांच्या खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस(इंदिरा) पक्षात परत प्रवेश केला. जून १९८८ मध्ये पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केन्द्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला. त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली. २६ जून इ.स. १९८८ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यापूर्वीच्या काळात राज्यात काँग्रेस पक्षाला फारसे आव्हान नव्हते. पण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष भारतीय जनता पक्षाशी युती करून काँग्रेस पक्षाच्या अनेक वर्षे अबाधित असलेल्या वर्चस्वाला आव्हान देऊ लागला होता. त्या आव्हानाला तोंड देऊन राज्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी पवारांवर आली.


नोव्हेंबर इ.स. १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील ४८ पैकी २८ जागा जिंकल्या. पक्षाची राजस्थान,मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांत झाली तशी वाताहत महाराष्ट्रात झाली नाही. पण इ.स. १९८४ च्या तुलनेत पक्षाने १५ जागा कमी जिंकल्या. शिवसेनेने ४ जागा जिंकून प्रथमच लोकसभेत प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाने १० जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी इ.स. १९९० मध्ये निवडणुका होणार होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या कानाकोपर्यात प्रचारसभा घेऊन काँग्रेस पक्षापुढे मोठे आव्हान उभे केले. राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २८८ पैकी १४१ तर शिवसेना-भाजप युतीने ९४ जागा जिंकल्या. राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाने विधानसभेतील बहुमत गमावले. तरीही १२ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी ४ मार्च इ.स. १९९० रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली.


जानेवारी इ.स. १९९१ मध्ये विलासराव देशमुख, सुरूपसिंग नाईक आणि इतर काही मंत्र्यांनी शरद पवारांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी पक्षाध्यक्ष राजीव गांधी यांच्याकडे केली. पण त्याला राजीव गांधींनी नकार दिला.


इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी काँग्रेस पक्षाचा राज्यात एकहाती प्रचार केला. पक्षाने राज्यात ४८ पैकी ३८ जागा जिंकल्या आणि इ.स. १९८९ च्या निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची काही अंशी भरपाई केली. निवडणुक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. श्री.पी.व्ही.नरसिंह राव आणि अर्जुनसिंग यांच्याबरोबर पवारांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे अशा बातम्या वर्तमानपत्रांत आल्या. मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने श्री.पी.व्ही.नरसिंह राव यांना नेतेपदी निवडले आणि त्यांचा २१ जून इ.स. १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.


#पुनः_दिल्ली:


नरसिंह रावांनी पवारांना केन्द्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. २६ जून इ.स. १९९१ रोजी त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक यांची निवड करण्यात आली. राज्य काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमले. त्यांनी ६ मार्च इ.स. १९९३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सूत्रे हाती घेतली.


#विधानसभा_चौथी_खेळी :


पवारांची मुख्यमंत्रिपदाची चौथी कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली. ते परत मुख्यमंत्री बनून एक आठवडा व्हायच्या आत, १२ मार्च इ.स. १९९३ रोजी मुंबईत भीषण बाँबस्फोट झाले. त्यांत २५७ लोक ठार तर ६००हून अधिक लोक जखमी झाले. ३० सप्टेंबर इ.स. १९९३ रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये भूकंप होऊन दहा हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले. या संकंटांबरोबरच राज्यात कमालीच्या वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त गो.रा.खैरनार यांनी पवारांना दोषी धरून त्यांच्यावर अनेक आरोप केले. प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांनी वनखात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केले. तेव्हा पवारांचे सरकार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप झाला. जळगाव येथील सेक्स स्कँडलमध्ये अनेक तरुणींवर लैंगिक अत्याचार झाले, त्यात काँग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक सामील आहेत असा आरोप झाला. २३ नोव्हेंबर इ.स. १९९४ रोजी नागपूर येथे गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला, त्यात चेंगराचेंगरी होऊन १२३ लोक मृत्युमुखी पडले. त्यांच्या शिष्टमंडळाची आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव पिचड यांनी वेळेत भेट न घेतल्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली असाही आरोप झाला.


राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी-मार्च इ.स. १९९५ मध्ये निवडणुका होणार होत्या. त्या निवडणुकींच्या तिकिटवाटपात काँग्रेस पक्षात मोठया प्रमाणावर बंडखोरी झाली. अनेक ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणुला लढवल्या.


जनतेत सरकारविरुद्ध वाढलेली नाराजी आणि मोठया प्रमाणावर झालेली बंडखोरी यांचे प्रतिबिंब मतपेटीत उमटले. काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला.शिवसेना-भाजप युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले.राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांचा १४ मार्च इ.स. १९९५ रोजी शपथविधी झाला.


#दिल्लीची_तिसरी_फेरी:


इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पवार राज्य विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते होते. इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीतून विजय मिळवला आणि त्यानंतर ते राष्टीय राजकारणात उतरले. जून इ.स. १९९७ मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली पण तीत त्यांचा पराभव झाला.


इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्षांबरोबर निवडणुकपूर्व आघाडी करायचा निर्णय घेतला.त्यामुळे शिवसेना-भाजप विरोधी मतांचे विभाजन टळले आणि काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या युतीने ४८ पैकी ३७ जागा जिंकून जोरदार यश प्राप्त केले.शिवसेना-भाजप युतीला १० जागांवर समाधान मानावे लागले.त्यानंतर शरद पवार १२ व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले.


१२वी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर मे इ.स. १९९९मध्ये पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांच्या साथीने शरद पवारांनी अशी मागणी केली की, '१३ व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या कोणाही नेत्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात त्या तिघांनी म्हटले,'उच्च शिक्षण, कर्तबगारी आणि पात्रता असलेल्या अनेक व्यक्ती असलेल्या या ९८ कोटी लोकांच्या भारत देशात भारताबाहेर जन्म झालेली कोणत्याही व्यक्तीने सरकारचे नेतृत्व करणे योग्य होणार नाही, कारण हा प्रश्न देशाची सुरक्षा, आर्थिक हितसंबंध आणि जागतिक राजकारणातील भारताच्या प्रतिमेबरोबरच प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेशी निगडित आहे' या कारणावरून काँग्रेस पक्षाने शरद पवार, पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले.


#राष्ट्रवादी_पक्ष:


त्यानंतर १० जून इ.स. १९९९ रोजी शरद पवारांनी त्यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची' स्थापना केली. इ.स. १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही.त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.


इ.स. २००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. २२ मे इ.स. २००४ मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. २९ मे इ.स. २००९ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली. जुलै इ.स. २०१०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षकार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा असल्याचे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली.


#क्रिकेट :


राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. २९ नोव्हेंबर इ.स. २००५ रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. १ जुलै इ.स. २०१० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत.


#शिक्षणसंस्थांमधील_सहभाग  :


पवारांचा शिक्षणक्षेत्राशीही सक्रिय संबंध आहे. त्यांनी ज्या शिक्षणसंस्थांच्या कामात सहभाग घेतला आहे, त्यातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्था खालीलप्रमाणे -


विद्या प्रतिष्ठान, बारामती.

कृषी विकास प्रतिष्ठान, बारामती.

रयत शिक्षण संस्था, सातारा.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी, पुणे.

शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव, बारामती.


#चरित्रे_आणि_आत्मचरित्र:


लोकनेते शरदराव पवार (लेखक - राम कांडगे)

Sharad Pawar - A Mass Leader (लेखक - दीपक बोरगावे)

शरद पवार यांचे ’लोक माझे सांगाती’ नावाचे मराठी आत्मचरित्र आहे.


महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६० सालची व शरद पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९६३ सालची ... म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राचा राजकीय इतिहास म्हणजेच पवार साहेबांची कारकिर्द. युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पासून राजकीय सुरुवात करुन पवार साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारताचे संरक्षण / कृषी मंत्री , लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदी पद भूषवली. १९६७-२०१७ ही पन्नास वर्ष विधानसभा , लोकसभा व आता राज्यसभेत ते सामान्यांपासून उद्योगपति , कला , क्रीडा , सांस्कृतिक आदी क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्राचा 'लोकनेता' कोण ? ह्या प्रश्नाचं उत्तर एकचं - शरद पवार ! पवार साहेबंना 77व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!


धन्यवाद लेख आवडल्यास  Share करा

छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत शिखरशिंगणापूर बद्दल वाचा थोडक्यात

शिखर शिंगणापूर मोठा महादेव

महाराष्ट्र हा संतानी पराक्रमी पुरुषांनी आणि देवीदेवतांच्या वरदहस्तानी फुलवलेला संपन्न प्रदेश आहे. महाराष्ट्रातील असंख्य धार्मिक स्थळे खूप प्राचीन, स्वयंभू आणि जागृत इतिहास असूनही महाराष्ट्राच्या नकाशावर अनभिज्ञ आहेत. यातीलच एक धार्मिक ठिकाण म्हणजे शिखर शिंगणापूर


शिखर शिंगणापूर इतिहास

शिखर शिंगणापूर येथून दहा मिनिटांच्या अंतरावर गुप्तलिंग हे देवस्थान आहे. शिखर शिंगणापूरची कथा हि गुप्तलीगापासूनच सुरु होते.


अख्यायिका अशी आहे कि गुप्तलीगावर श्री शंभू महादेव घोर तपश्चर्येला बसले होते. पार्वती माता भिल्लीणीच्या रुपात तेथे आली. तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली. तपश्चर्या भंग होताच भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटा तेथील शिळेवर आपटल्या. जटा आपटता क्षणी त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. आजही गुप्तलिंगावर गोमुखातून पाण्याचा अविरत प्रवाह सुरु आहे. पार्वती मातेने श्री शंभू महादेवांची क्षमा मागितली. पार्वती मातेच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले. गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव आणि पार्वती मातेचे मिलन झाले. भगवान शंकर आणि पार्वती माता यांचा विवाह चैत्र शुद्ध अष्टमीला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे पार पडला.


गुप्तलिंग हे सातारच्या छत्रपतींच्या शाही घराण्याचे खाजगी देवस्थान आहे. या ठिकाणी श्रमदानातून आणि छत्रपतींच्या फंडातून जीर्णोद्धार केला गेला आहे. गुप्तलिंगावर आजही दोन कुंडे प्रवाहित आहेत. एक जटा कुंड ज्या ठिकाणी श्री शंभू महादेवानी आपल्या जटा आपटल्या होत्या आणि दुसरे आहे भागीरथी कुंड जे पार्वती मातेचे कुंड म्हणून ओळखले जाते.


गुप्तलिंगाच्या मंदिरापर्यंत जाण्याकरिता प्रशस्थ पायऱ्यांची वाट आहे. आपली गाडी पार्क करून पाच ते दहा मिनिटे चालत गेल्यावर थंडगार गुप्तलिंगाच्या मंदिराचे दर्शन होते. रणरणत्या उन्हातही गुप्तलिंग यात्रेकरूना थंडावल्याचा अनुभव देऊन जाते. गुप्तलींगाचे दर्शन घेतल्याशिवाय श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरचे दर्शन पूर्ण होत नाही.



 

शिखर शिंगणापूरच यात्रा

 

शिखर शिंगणापूरची यात्रा बारा दिवस चालते. यात्रेची सुरवात गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेलाहोते. शुभशकुनाची गुढी उभारून श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ होतो. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री बारा वाजता देवाची लग्न लावली जातात.


एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राज घराण्यातील युवराज किव्हा राजा शिखर शिंगणापूरला येतो आणि देवस्थानातर्फे राजाचा सत्कार समारंभ केला जातो. असे म्हणतात कि देवाच्या लग्नाच्या वेळी चुकून राजाला आमंत्रण गेले नाही. राजा रागावून घोड्यावरून निघाला आणि तडक शिखर शिंगणापूरला आला. एकादशीचा उपवास असूनही देवावर रागावला आणि कांदा भाकरी खाऊन व पायात जोडे ठेऊन देवाच्या लग्नाला आला. महादेवाने राजाची समजूत काढली, राजाचा राग शांत केला आणि राजाचा सत्कार केला. आजही हीच परंपरा राखली जाते.


शिखर शिंगणापूरची यात्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबन येथे भरली जाते. या उमाबनात प्रत्येक गावासाठी एक झाड दिले आहे. गावकरी आपापल्या झाडापाशी जमा होऊन यात्रेचा आनंद लुटतात. अशा प्रकारे झाडे नेमून देणारी हि पहिलीच यात्रा असावी.


श्री शिखर शिंगणापूरच्या यात्रेतील सर्वात अदभूत सोहळा म्हणजे पालखी सोहळा. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थ क्षेत्राचे पाणी कावडीतून आणले जाते. बऱ्याच गावातून अनेक कावडी येतात पण मनाची कावडभुतोजी तेली यांची असते.


भुतोजी तेली यांची कावड सासवड या गावातून येते. यात्रे अगोदर हि मानाची कावड सासवड वरून प्रस्थान करते. फार पूर्वीपासून हि प्रथा चालू आहे. देवाला जाताना निसंकोच मनाने जावे आणि मागे काहीही ठेऊ नये ज्याच्या चिंतेने देवाचे दर्शन व्यवस्तीत होणार नाही. या विचारापोटी भुतोजी तेली शिखर शिंगणापूरच्या यात्रेला जाण्यापूर्वी आपल्या घरादारास आग लावीत असत. निसंकोच मनाने आणि देवाच्या ओढीने त्यांची कावड द्वादशीलाशिंगणापूरच्या पायथ्याशी पोहचत असे.


दुपार नंतर हि कावड अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून महादेवाच्या डोंगरावर चढत जाते. हे द्रुश्य फारच मोहक असते. सध्या गाड्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवला आहे पण आजही शिखर शिंगणापूरला येणाऱ्या कावडी धोंड्याच्या मुंगी घाटातूनच वर मार्ग काढतात. मानाच्या कावडी मागे इतरही कावडी मार्गस्थ होतात. पूर्वी जेव्हा भुतोजी तेली पौर्णिमेनंतर यात्रा संपवून घरी जात त्यावेळी त्यांचे घर व दार सर्व सुखरूप असे. श्री शंभू महादेवाची लीला अपरंपार आहे. यातच श्री शंभू महादेवाच्या चमत्काराची प्रचीती येते.


सर्व भाविक देवाच्या या विलोभनीय सोहळ्यात मनोभावे सामील होतात. सर्व बांधव एकत्र येऊन देवाचा हा सोहळा उत्तम रीतीने पार पाडतात. तुम्हीही या सोहळ्यात शामिल व्हा आणि देवाचा हा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पहा मगच तुम्हाला श्री शंभू महादेवाच्या अस्तित्वाची खरी प्रचीती येईल.


कावड सोहळा हा अत्यंत नयनरम्य असतो. कावडी चढवत असताना हलगी, तुरे आणि लेझीम याच्या तालावर अनेक भक्तगण आपल्याला नाचताना पाहायला मिळतात. कावड सहा कवड्यांच्या खांद्यावरून नेली जाते. पुढे तीन आणि मागे तीन असे सहा कावडी एक कावड घेऊन शिखर शिंगणापूर वाट पूर्ण करतात. मौज म्हणून कवड्यामध्ये रस्सीखेच खेळली जाते. कावडीतील पाणी नीरा नदीच्या पात्रातून भरून आणले जाते. या सोहळ्यात अनेक जन कावडीचे दर्शन घेतात. लहान मुलांना कावडीच्या खाली झोपवले जाते त्यामुळे लहान मुलास देवाचा आशीर्वाद मिळतो अशी समजूत लोकांमध्ये आहे.


आजही भुतोजी तेली यांचे वंशज कावडी घेऊन शिखर शिंगणापूरच्या यात्रेस येतात. येताना प्रतीकात्मक रूप म्हणून गवताची झोपडी जाळली जाते आणि नंतरच कावड शिखर शिंगणापूरच्या दिशेने चालू लागते. द्वादशीला रात्री बारा वाजता कावडीच्या पाण्याने देवाला अभिषेक केला जातो. त्यानंतर चिमणगाव तालुका कोरेगाव येथील पालखीची मिरवणूक काढण्यात येते. या सोहळ्यानंतर श्री शिखर शिंगणापूरची यात्रा संपते आणि सर्व यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरु होतो. सार्वजन भक्तीत न्हाऊन आपापल्या घरी जातात.



 

 


आमदार गणपतराव देशमुख यांचा आदर्श घ्यावा !!!!

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या विविध मुद्द्यांनी गाजत आहे


. मात्र हिवाळी अधिवेशनातील एका फोटोची सध्या मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे. हा फोटो आहे, शेकापचे आमदार देशमुख यांच्या. शेकापाचे आमदार गणपतराव देशमुख वयाच्या ९१ व्या वर्षीही अधिवेनासाठी एसटीने प्रवास करतात, असे या व्हायरल फोटोत म्हटले आहे. एसटीत आमदार, खासदारांसाठी जागा राखीव असते, मात्र याचा वापर झालेला तुम्ही क्वचितच पाहिले असेल. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटणाऱ्या या फोटोची ‘एका वृत्तवाही’ने पडताळणी केली.

गणपतराव देशमुख अधिवेशनासाठी नागपूरला बसने गेले का, याची पडताळणी केली असता असे कळाले की, ते अधिवेशनासाठी ट्रेनने जातात, अशी माहिती मिळाली. मात्र आमदार निवास ते विधानभवन हा प्रवास ते स्वत:च्या गाडीने करत नाहीत. उपलब्ध असलेल्या एसटी किंवा सरकारी वाहनाने ते तेथील प्रवास करतात. इतर आमदार स्वत:च्या गाडीने आमदार निवास ते विधानभवन प्रवास करात.

सांगोल ते नागपूर हे जवळपास ७०० किलोमीटर अंतर आहे. हा प्रवास करण्यासाठी अंदाजे १४ ते १५ तासांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे एखादा त्यामुळे एखादा आमदार इतक्या तासांचा प्रवास बसने करणं कठीण आहे. त्यामुळे हा फोटो कमी अंतराच्या प्रवासानंतरचा असेल. गणपतराव देशमुख आजही अधिवेशनासाठी एसटीने प्रवास करतात, असा दावा व्हायरल फोटोत करण्यात आला आहे. मात्र ते अधिवेशनाच्या काळात आमदार निवास ते विधानभवन प्रवास एसटीने करतात, असं एबीपी माझाच्या पडताळणीतून समोर आलं आहे. नागपूरला ते ट्रेननेच जातात.

#पण_काही_का_असेना_सलाम_या_आमदारसाहेबांना बाकीच्या आमदारांनी यांचा आदर्श घ्यावा

आमचे पेज लाईक करायला विसरू नका JaraHatke