भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचं दिल्लीमध्ये रिसेप्शन झालं
आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हजेरी लावली आणि दोघांना शुभेच्छा दिल्या.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मानं कालच जाऊन पंतप्रधानांना लग्नाचं आमंत्रण दिलं. या दोघांच्या आमंत्रणाचा मान ठेवून मोदी या सोहळ्याला उपस्थित राहिले. रिसेप्शनच्या आधी विराट आणि अनुष्का माध्यमांसमोर आले.
'विरुष्का'च्या रिसेप्शनसाठी ५०० हून अधिक जणांना आमंत्रित करण्यात आलंय... तर २६ डिसेंबर रोजी मुंबईतही एका पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये अनेक दिग्गज बॉलिवूड स्टार्स उपस्थित होतील.
No comments:
Post a Comment