Wednesday, 10 January 2018
Tuesday, 9 January 2018
पहा छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली एक सुंदर व्याख्या


पहा छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली एक सुंदर व्याख्या
Friday, 5 January 2018
सिपना शोध यात्रा (शिबिर) वृत्त


सिपना शोध यात्रा (शिबिर) वृत्त
६ वर्षापासून सातत्याने चालणारी सिपना शोध यात्रा यावर्षी नेहमीप्रमाणे २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर ग्रामग्यानपीठ , कोठा , मेळघाट येथे संप्पन झाली.
पुण्यातील
COEP येथील NSS च्या ४० विद्यार्थी व विद्यार्थीनीनी डाॕ.हिरेमठ व
प्रा.चौधरी यांच्या पुढाकाराने प्रा.खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच
वेदपाठक व पोतदार सर यांच्या उपस्थितीत यात भाग घेतला होता.
मेळघाट सपोर्ट ग्रुपचे श्री.नागेश माटनवर या सर्वांची काळजी घ्यायला होतेच.
दिनांक
२४ रात्री पुण्याहून निघालेली टीम २५ दुपारी तेथे पोचली. त्या दिवशी
ग्रामग्यानपीठ बघणे व तेथील परीसराची माहिती घेण्यात आली. संध्याकाळी
शिबिराची सुरवात झाली. पुणे व्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर ठिकाणाहून
बरेच जण या शिबिराला सहभागी झाले होते. रोज ७० ते ७५ जणांचा सहभाग होता.
२६
डिसेंबर - सकाळी जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळ नागपूर चेतन खंडकर यांच्या
मार्गदर्शनाखाली सौ. भारतीताई कालबांडे व श्री. अशोक बेलसरे यांचे योग
प्रात्यक्षिके व माहिती असे सत्र झाले.
त्यानंतर ११ ते २ श्रमदान - तळे तयार करण्याचे.
संध्याकाळी भूसंपदेचा अभ्यास शेतावर जाऊन केला गेला व सिपना वार्ता मधे आजच्या दिवसाचा आढावा घेण्यात आला
![]() |
SHRAMDAN |
![]() |
SHRAMDAN |
२७ डिसेंबर
योगासने
प्रार्थना
श्रमदान
व वनसंपदेचा अभ्यास जंगलात भ्रमण करुन केला गेला
त्यादिवशी विदर्भ प्रगेलास प्रचारक श्री.प्रसाद महानकर यांनी सेवा व संघटन या विषयाअंतर्गत सत्र घेतले व मुलांशी गप्पा मारल्या
विज्ञान आश्रम पाबळ पुणे येथील श्री.योगेश कुलकर्णी यांचे अनुभव कथन झाले
२८ डिसेंबर
निरुपमाताईंनी योगासने
प्रार्थना
श्रमदान
नभसंपदेचा अभ्यास बोरी तलावावर जाऊन केला गेला
त्यादिवशी वनवासी कल्याण आश्रमाचे महेशजी काळे यांचे समाज व सामाजिक काम या विषयावर सत्र झाले.
रूषीकेश खिल्लारेंचे हुनर खोजयात्रा अनुभव कथन झाले
२९ डिसेंबर
योगासने
प्रार्थना
पशू संपदेचा अभ्यास पाणवठ्यवर व जंगलात जाऊन केला
सिपना परीसर माहीती सुनीलजींनी सांगितली.
तसेच निरुपमाजींनी संपूर्ण बांबू केन्द्राचे काम व त्यांना व सुनीलजींना गेली २४ वर्षे आलेले विविध अनुभव सांगितले.
तसेच त्या दिवशी बांबू पासून तेल कसे काढतात त्याचे प्रात्यक्षिक सुनीलजींनी करुन दाखविले.
या तेलाचे testing Coep मधे केले जाणार आहे.
३० डिसेंबर
सकाळीच ६.३० ला सिपना नदी परीक्रमा चालू झाली.
जलसंपदेचा अभ्यास नदी भ्रमण करुन
नदीतीरावरील सर्व संपदांचा अभ्यास एकीकडे करत व बाजीराव व तेथील माहीतगार कोरकू समाजातील मंडळी सोबत होतीच.
निसर्ग रम्य परीसरात वनभोजन तेथील नदीचेच प्यायला गार पाणी.
परत परीक्रमा चालू.
संध्याकाळी
सिपना देवीची प्रतिकृती घेऊन सिपना नदीवरील गाणे गात वाद्यांच्या गजरात
ग्रामग्यानपीठावरुन निघालो सिपना नदीची आरती करण्यास व दीपदान करण्यास
६.३० वाजता परीक्रमा करणारे देखील त्या ठिकाणी पोचले.
तेथील स्थानिक महाराज व नदीविषयी माहीती असणारे व आस्था असणारे भगवान बाबा
यांनी या आरतीचे जनजागृती करण्याकरीता असलेले महत्व सांगितले.
सुनीलजींनी नदीची परंपरा व नदीवर केलेले गाणे म्हटले.
२०० च्यावर दिप मिळून ॐ तयार केला होता.
नागपूरचे कार्यकर्ते श्री.सतीश देशमुख दाम्पत्य यांनी सिपना नदीची पूजा केली.
त्यानंतर सिपना नदी देवीची आरती करण्याची संधी सुनीलजींनी मला व रसिकाला दिली.
त्यानंतर ॐ आकारातले दिप पेटविण्यात आले.
व जमलेल्या सर्व समुदायाने हे दिप पाण्यात दान केले.
विहंगम दृश्य , सिपनामय झालेले सगळ्यांचे मन ह्या सोहळ्याचे वर्णन शब्दात न सांगता येण्यासारखे
३१ डिसेंबर
योगासने व प्रार्थना होऊन
पाणी विषयातील ओलावा फाऊंडेशन चे श्री.अरविंद कडबे यांचे सत्र झाले.
सर्व
मुलांनी ४ दिवसात आजूबाजूच्या परीसरात जाऊन केलेला परीसंवाद व सर्व
भूसंपदाचा अभ्यास या सर्वाची पावती म्हणजे त्या दिवशी भरलेली " सिपना
पंचायत." म्हणजेच जनसंपदेचा अभ्यास.
या पंचायतीस कोठा , चित्री , लवादा , राणामालूज व हरीसाल येथून गावकरी आले होते.
सिपना पंचायत पूर्ण सांगाण्याकरीता वेगळा लेख लिहावयास लागेल.
या पंचायतीत प्रमुखपणे बसलेले
- गावचे आडा पाटील
- कारागीर समाजाचे प्रतिनीधी
- तंटामुक्ती अध्यक्ष
- पंचक्रोशी प्रतीनिधी - बाजीराव
- COEP NSS प्रतिनीधी -
मेळघाट सपोर्ट ग्रुप प्रतिनीधी - राजेश गुर्जर
- सर्वांचे मार्गदर्शक सुनीलजी
या पंचायतीत खटावकर सर यांच्या नेतृत्वाखाली मुलांनी केलेला सर्व संपदांचा अभ्यास मांडला
समाजातील चालीरीती व त्यावर चर्चा झाली.
कोठा या गावाने केलेली दारुबंदी मोहीम
गावात दर आठवड्याला चालणारे उत्स्फूर्त स्वच्छता अभियान
गावातील काहीजणांनी शोषखड्डा प्रयोग व त्यावर अजून चांगल्या प्रकारे तो कसा राबवता येईल हे civil च्या विद्यार्थ्यांनी पोतदार सरांबरोबर केलेला अभ्यास
गावात गोबर गॕस असावा व तो चालविण्याची सर्व गावकरी यांची इच्छा
असे अनेक विषयावर संभाषण झाले.
गोबर गॕस व शोषखड्ड्याची गरज यावर सर्वांनी ठराव केले.
आगामी वर्षात यावर तेथे COEP , मेळघाट सपोर्ट ग्रुप व सेवावर्धिनी काम करेल.
हे शिबिर संप्पन होण्यामागे सुनीलजी व निरुपमाजींनी ऊभा केलेला संपूर्ण बांबू केन्द्राचा कार्यकर्ता संच व त्यांचे परीश्रम
प्रकाश , बाजीराव , सहदेव , चंदा , भुरेलाल अजून नावे पटकन तोंडावर नाहीत पण चेहरा माहीत असलेले अनेकजण
NSS शिबिरातील सर्व मुलामुलींचे श्रम
हे सर्व सैन्य पोटावर चालवले ती टीम सुखदेव गायन ,नंदलाल जावरकर , गोरेलाल , कोठा गावच्या चार भगिनी व संगीताताई न्यायाधीश यांना विसरणे शक्य नाही. बरेच शहरात न मिळणारे गावरान चविष्ठ पदार्थ खायला मिळाले
संपूर्ण बांबू केन्द्राचे अमरावतीमधील सतीश विश्वकर्मा , तसेच श्री.मालपाणी , पुण्यातील एक खाजगी शाळा चालविणारे श्री.राजेश , तसेच औरंगाबाद येथील सुवर्णाताई आम्ही सर्व मेळघाट सपोर्ट ग्रुपचे असे अनेकजण या शिबिराकरीता आलेले होते. व प्रत्येकजण आपल्या आपल्या ठिकाणाहून मेळघाटातील या बांधवांकरीता काय करता येईल व त्यांच्याकडून काय शिकता येईल याचा अनुभव घेऊन निघालो परत येण्याच्या इराद्यानेच .......
मेळघाट सपोर्ट ग्रुप पुणे
NSS CAMP 2017
सिपना शोध यात्रा (शिबिर) वृत्त
६ वर्षापासून सातत्याने चालणारी सिपना शोध यात्रा यावर्षी नेहमीप्रमाणे २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर ग्रामग्यानपीठ , कोठा , मेळघाट येथे संप्पन झाली.
पुण्यातील COEP येथील NSS च्या ४० विद्यार्थी व विद्यार्थीनीनी डाॕ.हिरेमठ व प्रा.चौधरी यांच्या पुढाकाराने प्रा.खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वेदपाठक व पोतदार सर यांच्या उपस्थितीत यात भाग घेतला होता.
मेळघाट सपोर्ट ग्रुपचे श्री.नागेश माटनवर या सर्वांची काळजी घ्यायला होतेच.
दिनांक २४ रात्री पुण्याहून निघालेली टीम २५ दुपारी तेथे पोचली. त्या दिवशी ग्रामग्यानपीठ बघणे व तेथील परीसराची माहिती घेण्यात आली. संध्याकाळी
शिबिराची सुरवात झाली. पुणे व्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर ठिकाणाहून बरेच जण या शिबिराला सहभागी झाले होते. रोज ७० ते ७५ जणांचा सहभाग होता.
२६ डिसेंबर - सकाळी जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळ नागपूर चेतन खंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. भारतीताई कालबांडे व श्री. अशोक बेलसरे यांचे योग प्रात्यक्षिके व माहिती असे सत्र झाले.
त्यानंतर ११ ते २ श्रमदान - तळे तयार करण्याचे.
संध्याकाळी भूसंपदेचा अभ्यास शेतावर जाऊन केला गेला व सिपना वार्ता मधे आजच्या दिवसाचा आढावा घेण्यात आला
२७ डिसेंबर
योगासने
प्रार्थना
श्रमदान
व वनसंपदेचा अभ्यास जंगलात भ्रमण करुन केला गेला
त्यादिवशी विदर्भ प्रगेलास प्रचारक श्री.प्रसाद महानकर यांनी सेवा व संघटन या विषयाअंतर्गत सत्र घेतले व मुलांशी गप्पा मारल्या
विज्ञान आश्रम पाबळ पुणे येथील श्री.योगेश कुलकर्णी यांचे अनुभव कथन झाले
२८ डिसेंबर
निरुपमाताईंनी योगासने
प्रार्थना
श्रमदान
नभसंपदेचा अभ्यास बोरी तलावावर जाऊन केला गेला
त्यादिवशी वनवासी कल्याण आश्रमाचे महेशजी काळे यांचे समाज व सामाजिक काम या विषयावर सत्र झाले.
रूषीकेश खिल्लारेंचे हुनर खोजयात्रा अनुभव कथन झाले
२९ डिसेंबर
योगासने
प्रार्थना
पशू संपदेचा अभ्यास पाणवठ्यवर व जंगलात जाऊन केला
सिपना परीसर माहीती सुनीलजींनी सांगितली.
तसेच निरुपमाजींनी संपूर्ण बांबू केन्द्राचे काम व त्यांना व सुनीलजींना गेली २४ वर्षे आलेले विविध अनुभव सांगितले.
तसेच त्या दिवशी बांबू पासून तेल कसे काढतात त्याचे प्रात्यक्षिक सुनीलजींनी करुन दाखविले.
या तेलाचे testing Coep मधे केले जाणार आहे.
३० डिसेंबर
सकाळीच ६.३० ला सिपना नदी परीक्रमा चालू झाली.
जलसंपदेचा अभ्यास नदी भ्रमण करुन
नदीतीरावरील सर्व संपदांचा अभ्यास एकीकडे करत व बाजीराव व तेथील माहीतगार कोरकू समाजातील मंडळी सोबत होतीच.
निसर्ग रम्य परीसरात वनभोजन तेथील नदीचेच प्यायला गार पाणी.
परत परीक्रमा चालू.
संध्याकाळी सिपना देवीची प्रतिकृती घेऊन सिपना नदीवरील गाणे गात वाद्यांच्या गजरात ग्रामग्यानपीठावरुन निघालो सिपना नदीची आरती करण्यास व दीपदान करण्यास
६.३० वाजता परीक्रमा करणारे देखील त्या ठिकाणी पोचले.
तेथील स्थानिक महाराज व नदीविषयी माहीती असणारे व आस्था असणारे भगवान बाबा यांनी या आरतीचे जनजागृती करण्याकरीता असलेले महत्व सांगितले.
सुनीलजींनी नदीची परंपरा व नदीवर केलेले गाणे म्हटले.
२०० च्यावर दिप मिळून ॐ तयार केला होता.
नागपूरचे कार्यकर्ते श्री.सतीश देशमुख दाम्पत्य यांनी सिपना नदीची पूजा केली.
त्यानंतर सिपना नदी देवीची आरती करण्याची संधी सुनीलजींनी मला व रसिकाला दिली.
त्यानंतर ॐ आकारातले दिप पेटविण्यात आले.
व जमलेल्या सर्व समुदायाने हे दिप पाण्यात दान केले.
विहंगम दृश्य , सिपनामय झालेले सगळ्यांचे मन ह्या सोहळ्याचे वर्णन शब्दात न सांगता येण्यासारखे
३१ डिसेंबर
योगासने व प्रार्थना होऊन
पाणी विषयातील ओलावा फाऊंडेशन चे श्री.अरविंद कडबे यांचे सत्र झाले.
सर्व मुलांनी ४ दिवसात आजूबाजूच्या परीसरात जाऊन केलेला परीसंवाद व सर्व भूसंपदाचा अभ्यास या सर्वाची पावती म्हणजे त्या दिवशी भरलेली " सिपना पंचायत." म्हणजेच जनसंपदेचा अभ्यास.
या पंचायतीस कोठा , चित्री , लवादा , राणामालूज व हरीसाल येथून गावकरी आले होते.
सिपना पंचायत पूर्ण सांगाण्याकरीता वेगळा लेख लिहावयास लागेल.
या पंचायतीत प्रमुखपणे बसलेले
- गावचे आडा पाटील
- कारागीर समाजाचे प्रतिनीधी
- तंटामुक्ती अध्यक्ष
- पंचक्रोशी प्रतीनिधी - बाजीराव
- COEP NSS प्रतिनीधी -
मेळघाट सपोर्ट ग्रुप प्रतिनीधी - राजेश गुर्जर
- सर्वांचे मार्गदर्शक सुनीलजी
या पंचायतीत खटावकर सर यांच्या नेतृत्वाखाली मुलांनी केलेला सर्व संपदांचा अभ्यास मांडला
समाजातील चालीरीती व त्यावर चर्चा झाली.
कोठा या गावाने केलेली दारुबंदी मोहीम
गावात दर आठवड्याला चालणारे उत्स्फूर्त स्वच्छता अभियान
गावातील काहीजणांनी शोषखड्डा प्रयोग व त्यावर अजून चांगल्या प्रकारे तो कसा राबवता येईल हे civil च्या विद्यार्थ्यांनी पोतदार सरांबरोबर केलेला अभ्यास
गावात गोबर गॕस असावा व तो चालविण्याची सर्व गावकरी यांची इच्छा
असे अनेक विषयावर संभाषण झाले.
गोबर गॕस व शोषखड्ड्याची गरज यावर सर्वांनी ठराव केले.
आगामी वर्षात यावर तेथे COEP , मेळघाट सपोर्ट ग्रुप व सेवावर्धिनी काम करेल.
हे शिबिर संप्पन होण्यामागे सुनीलजी व निरुपमाजींनी ऊभा केलेला संपूर्ण बांबू केन्द्राचा कार्यकर्ता संच व त्यांचे परीश्रम
प्रकाश , बाजीराव , सहदेव , चंदा , भुरेलाल अजून नावे पटकन तोंडावर नाहीत पण चेहरा माहीत असलेले अनेकजण
NSS शिबिरातील सर्व मुलामुलींचे श्रम
हे सर्व सैन्य पोटावर चालवले ती टीम सुखदेव गायन ,नंदलाल जावरकर , गोरेलाल , कोठा गावच्या चार भगिनी व संगीताताई न्यायाधीश यांना विसरणे शक्य नाही. बरेच शहरात न मिळणारे गावरान चविष्ठ पदार्थ खायला मिळाले
संपूर्ण बांबू केन्द्राचे अमरावतीमधील सतीश विश्वकर्मा , तसेच श्री.मालपाणी , पुण्यातील एक खाजगी शाळा चालविणारे श्री.राजेश , तसेच औरंगाबाद येथील सुवर्णाताई आम्ही सर्व मेळघाट सपोर्ट ग्रुपचे असे अनेकजण या शिबिराकरीता आलेले होते. व प्रत्येकजण आपल्या आपल्या ठिकाणाहून मेळघाटातील या बांधवांकरीता काय करता येईल व त्यांच्याकडून काय शिकता येईल याचा अनुभव घेऊन निघालो परत येण्याच्या इराद्यानेच .......
मेळघाट सपोर्ट ग्रुप पुणे
मा. खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस पहा त्यांचा जीवन प्रवास

#महाराष्ट्राचे_सुपुत्र
#आ_शरद_पवार_साहेब_यांच्या_वाढदिवसा_निमित्ताने
#थोडक्यात_कर्तृत्व_परिचय
पवारांचा जन्म डिसेंबर १२, इ.स. १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. इ.स. १९५६ साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली.त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.
इ.स. १९६६ साली पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली.त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला.
#विधानसभा:
सर्वप्रथम इ.स. १९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या २९व्या वर्षी झाला. इ.स. १९७२ आणि इ.स. १९७८ सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले. इ.स. १९७८ सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हेसुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते. पण काँग्रेस पक्षाचे १२ आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले. त्यानंतर 'पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला' अशी जळजळीत प्रतिक्रिया वसंतरावांनी दिली व १९७८ ला शरद पवार यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री करण्यात सहकार महर्षी केशवराव सोनवणे यांचे फार मोठे योगदान होते याची त्यांनी आठवण ठेवली नाही.
#मुख्यमंत्री :
१८ जुलै इ.स. १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले.ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. इ.स. १९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून इ.स. १९८० मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस(इंदिरा) पक्षाने २८८ पैकी १८६ जागा जिंकल्या आणि बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.
#लोकसभा :
इ.स. १९८४ सालची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील ४८ पैकी केवळ ५ जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता .मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले. मार्च इ.स. १९८५ ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस(स) पक्षाने २८८ पैकी ५४ जागा जिंकल्या आणि पवार राज्यविधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.
#परत_विधानसभा:
इ.स. १९८७ साली ९ वर्षांच्या खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस(इंदिरा) पक्षात परत प्रवेश केला. जून १९८८ मध्ये पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केन्द्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला. त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली. २६ जून इ.स. १९८८ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यापूर्वीच्या काळात राज्यात काँग्रेस पक्षाला फारसे आव्हान नव्हते. पण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष भारतीय जनता पक्षाशी युती करून काँग्रेस पक्षाच्या अनेक वर्षे अबाधित असलेल्या वर्चस्वाला आव्हान देऊ लागला होता. त्या आव्हानाला तोंड देऊन राज्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी पवारांवर आली.
नोव्हेंबर इ.स. १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील ४८ पैकी २८ जागा जिंकल्या. पक्षाची राजस्थान,मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांत झाली तशी वाताहत महाराष्ट्रात झाली नाही. पण इ.स. १९८४ च्या तुलनेत पक्षाने १५ जागा कमी जिंकल्या. शिवसेनेने ४ जागा जिंकून प्रथमच लोकसभेत प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाने १० जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी इ.स. १९९० मध्ये निवडणुका होणार होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या कानाकोपर्यात प्रचारसभा घेऊन काँग्रेस पक्षापुढे मोठे आव्हान उभे केले. राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २८८ पैकी १४१ तर शिवसेना-भाजप युतीने ९४ जागा जिंकल्या. राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाने विधानसभेतील बहुमत गमावले. तरीही १२ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी ४ मार्च इ.स. १९९० रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली.
जानेवारी इ.स. १९९१ मध्ये विलासराव देशमुख, सुरूपसिंग नाईक आणि इतर काही मंत्र्यांनी शरद पवारांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी पक्षाध्यक्ष राजीव गांधी यांच्याकडे केली. पण त्याला राजीव गांधींनी नकार दिला.
इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी काँग्रेस पक्षाचा राज्यात एकहाती प्रचार केला. पक्षाने राज्यात ४८ पैकी ३८ जागा जिंकल्या आणि इ.स. १९८९ च्या निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची काही अंशी भरपाई केली. निवडणुक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. श्री.पी.व्ही.नरसिंह राव आणि अर्जुनसिंग यांच्याबरोबर पवारांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे अशा बातम्या वर्तमानपत्रांत आल्या. मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने श्री.पी.व्ही.नरसिंह राव यांना नेतेपदी निवडले आणि त्यांचा २१ जून इ.स. १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.
#पुनः_दिल्ली:
नरसिंह रावांनी पवारांना केन्द्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. २६ जून इ.स. १९९१ रोजी त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक यांची निवड करण्यात आली. राज्य काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमले. त्यांनी ६ मार्च इ.स. १९९३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सूत्रे हाती घेतली.
#विधानसभा_चौथी_खेळी :
पवारांची मुख्यमंत्रिपदाची चौथी कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली. ते परत मुख्यमंत्री बनून एक आठवडा व्हायच्या आत, १२ मार्च इ.स. १९९३ रोजी मुंबईत भीषण बाँबस्फोट झाले. त्यांत २५७ लोक ठार तर ६००हून अधिक लोक जखमी झाले. ३० सप्टेंबर इ.स. १९९३ रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये भूकंप होऊन दहा हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले. या संकंटांबरोबरच राज्यात कमालीच्या वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त गो.रा.खैरनार यांनी पवारांना दोषी धरून त्यांच्यावर अनेक आरोप केले. प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांनी वनखात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केले. तेव्हा पवारांचे सरकार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप झाला. जळगाव येथील सेक्स स्कँडलमध्ये अनेक तरुणींवर लैंगिक अत्याचार झाले, त्यात काँग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक सामील आहेत असा आरोप झाला. २३ नोव्हेंबर इ.स. १९९४ रोजी नागपूर येथे गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला, त्यात चेंगराचेंगरी होऊन १२३ लोक मृत्युमुखी पडले. त्यांच्या शिष्टमंडळाची आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव पिचड यांनी वेळेत भेट न घेतल्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली असाही आरोप झाला.
राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी-मार्च इ.स. १९९५ मध्ये निवडणुका होणार होत्या. त्या निवडणुकींच्या तिकिटवाटपात काँग्रेस पक्षात मोठया प्रमाणावर बंडखोरी झाली. अनेक ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणुला लढवल्या.
जनतेत सरकारविरुद्ध वाढलेली नाराजी आणि मोठया प्रमाणावर झालेली बंडखोरी यांचे प्रतिबिंब मतपेटीत उमटले. काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला.शिवसेना-भाजप युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले.राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांचा १४ मार्च इ.स. १९९५ रोजी शपथविधी झाला.
#दिल्लीची_तिसरी_फेरी:
इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पवार राज्य विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते होते. इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीतून विजय मिळवला आणि त्यानंतर ते राष्टीय राजकारणात उतरले. जून इ.स. १९९७ मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली पण तीत त्यांचा पराभव झाला.
इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्षांबरोबर निवडणुकपूर्व आघाडी करायचा निर्णय घेतला.त्यामुळे शिवसेना-भाजप विरोधी मतांचे विभाजन टळले आणि काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या युतीने ४८ पैकी ३७ जागा जिंकून जोरदार यश प्राप्त केले.शिवसेना-भाजप युतीला १० जागांवर समाधान मानावे लागले.त्यानंतर शरद पवार १२ व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले.
१२वी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर मे इ.स. १९९९मध्ये पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांच्या साथीने शरद पवारांनी अशी मागणी केली की, '१३ व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या कोणाही नेत्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात त्या तिघांनी म्हटले,'उच्च शिक्षण, कर्तबगारी आणि पात्रता असलेल्या अनेक व्यक्ती असलेल्या या ९८ कोटी लोकांच्या भारत देशात भारताबाहेर जन्म झालेली कोणत्याही व्यक्तीने सरकारचे नेतृत्व करणे योग्य होणार नाही, कारण हा प्रश्न देशाची सुरक्षा, आर्थिक हितसंबंध आणि जागतिक राजकारणातील भारताच्या प्रतिमेबरोबरच प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेशी निगडित आहे' या कारणावरून काँग्रेस पक्षाने शरद पवार, पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले.
#राष्ट्रवादी_पक्ष:
त्यानंतर १० जून इ.स. १९९९ रोजी शरद पवारांनी त्यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची' स्थापना केली. इ.स. १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही.त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.
इ.स. २००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. २२ मे इ.स. २००४ मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. २९ मे इ.स. २००९ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली. जुलै इ.स. २०१०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षकार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा असल्याचे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली.
#क्रिकेट :
राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. २९ नोव्हेंबर इ.स. २००५ रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. १ जुलै इ.स. २०१० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत.
#शिक्षणसंस्थांमधील_सहभाग :
पवारांचा शिक्षणक्षेत्राशीही सक्रिय संबंध आहे. त्यांनी ज्या शिक्षणसंस्थांच्या कामात सहभाग घेतला आहे, त्यातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्था खालीलप्रमाणे -
विद्या प्रतिष्ठान, बारामती.
कृषी विकास प्रतिष्ठान, बारामती.
रयत शिक्षण संस्था, सातारा.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी, पुणे.
शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव, बारामती.
#चरित्रे_आणि_आत्मचरित्र:
लोकनेते शरदराव पवार (लेखक - राम कांडगे)
Sharad Pawar - A Mass Leader (लेखक - दीपक बोरगावे)
शरद पवार यांचे ’लोक माझे सांगाती’ नावाचे मराठी आत्मचरित्र आहे.
महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६० सालची व शरद पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९६३ सालची ... म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राचा राजकीय इतिहास म्हणजेच पवार साहेबांची कारकिर्द. युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पासून राजकीय सुरुवात करुन पवार साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारताचे संरक्षण / कृषी मंत्री , लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदी पद भूषवली. १९६७-२०१७ ही पन्नास वर्ष विधानसभा , लोकसभा व आता राज्यसभेत ते सामान्यांपासून उद्योगपति , कला , क्रीडा , सांस्कृतिक आदी क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्राचा 'लोकनेता' कोण ? ह्या प्रश्नाचं उत्तर एकचं - शरद पवार ! पवार साहेबंना 77व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!
धन्यवाद लेख आवडल्यास Share करा
छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत शिखरशिंगणापूर बद्दल वाचा थोडक्यात

शिखर शिंगणापूर मोठा महादेव
महाराष्ट्र हा संतानी पराक्रमी पुरुषांनी आणि देवीदेवतांच्या वरदहस्तानी फुलवलेला संपन्न प्रदेश आहे. महाराष्ट्रातील असंख्य धार्मिक स्थळे खूप प्राचीन, स्वयंभू आणि जागृत इतिहास असूनही महाराष्ट्राच्या नकाशावर अनभिज्ञ आहेत. यातीलच एक धार्मिक ठिकाण म्हणजे शिखर शिंगणापूर
शिखर शिंगणापूर इतिहास
शिखर शिंगणापूर येथून दहा मिनिटांच्या अंतरावर गुप्तलिंग हे देवस्थान आहे. शिखर शिंगणापूरची कथा हि गुप्तलीगापासूनच सुरु होते.
अख्यायिका अशी आहे कि गुप्तलीगावर श्री शंभू महादेव घोर तपश्चर्येला बसले होते. पार्वती माता भिल्लीणीच्या रुपात तेथे आली. तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली. तपश्चर्या भंग होताच भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटा तेथील शिळेवर आपटल्या. जटा आपटता क्षणी त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. आजही गुप्तलिंगावर गोमुखातून पाण्याचा अविरत प्रवाह सुरु आहे. पार्वती मातेने श्री शंभू महादेवांची क्षमा मागितली. पार्वती मातेच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले. गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव आणि पार्वती मातेचे मिलन झाले. भगवान शंकर आणि पार्वती माता यांचा विवाह चैत्र शुद्ध अष्टमीला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे पार पडला.
गुप्तलिंग हे सातारच्या छत्रपतींच्या शाही घराण्याचे खाजगी देवस्थान आहे. या ठिकाणी श्रमदानातून आणि छत्रपतींच्या फंडातून जीर्णोद्धार केला गेला आहे. गुप्तलिंगावर आजही दोन कुंडे प्रवाहित आहेत. एक जटा कुंड ज्या ठिकाणी श्री शंभू महादेवानी आपल्या जटा आपटल्या होत्या आणि दुसरे आहे भागीरथी कुंड जे पार्वती मातेचे कुंड म्हणून ओळखले जाते.
गुप्तलिंगाच्या मंदिरापर्यंत जाण्याकरिता प्रशस्थ पायऱ्यांची वाट आहे. आपली गाडी पार्क करून पाच ते दहा मिनिटे चालत गेल्यावर थंडगार गुप्तलिंगाच्या मंदिराचे दर्शन होते. रणरणत्या उन्हातही गुप्तलिंग यात्रेकरूना थंडावल्याचा अनुभव देऊन जाते. गुप्तलींगाचे दर्शन घेतल्याशिवाय श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरचे दर्शन पूर्ण होत नाही.

शिखर शिंगणापूरच यात्रा
शिखर शिंगणापूरची यात्रा बारा दिवस चालते. यात्रेची सुरवात गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेलाहोते. शुभशकुनाची गुढी उभारून श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ होतो. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री बारा वाजता देवाची लग्न लावली जातात.
एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राज घराण्यातील युवराज किव्हा राजा शिखर शिंगणापूरला येतो आणि देवस्थानातर्फे राजाचा सत्कार समारंभ केला जातो. असे म्हणतात कि देवाच्या लग्नाच्या वेळी चुकून राजाला आमंत्रण गेले नाही. राजा रागावून घोड्यावरून निघाला आणि तडक शिखर शिंगणापूरला आला. एकादशीचा उपवास असूनही देवावर रागावला आणि कांदा भाकरी खाऊन व पायात जोडे ठेऊन देवाच्या लग्नाला आला. महादेवाने राजाची समजूत काढली, राजाचा राग शांत केला आणि राजाचा सत्कार केला. आजही हीच परंपरा राखली जाते.
शिखर शिंगणापूरची यात्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबन येथे भरली जाते. या उमाबनात प्रत्येक गावासाठी एक झाड दिले आहे. गावकरी आपापल्या झाडापाशी जमा होऊन यात्रेचा आनंद लुटतात. अशा प्रकारे झाडे नेमून देणारी हि पहिलीच यात्रा असावी.
श्री शिखर शिंगणापूरच्या यात्रेतील सर्वात अदभूत सोहळा म्हणजे पालखी सोहळा. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थ क्षेत्राचे पाणी कावडीतून आणले जाते. बऱ्याच गावातून अनेक कावडी येतात पण मनाची कावडभुतोजी तेली यांची असते.
भुतोजी तेली यांची कावड सासवड या गावातून येते. यात्रे अगोदर हि मानाची कावड सासवड वरून प्रस्थान करते. फार पूर्वीपासून हि प्रथा चालू आहे. देवाला जाताना निसंकोच मनाने जावे आणि मागे काहीही ठेऊ नये ज्याच्या चिंतेने देवाचे दर्शन व्यवस्तीत होणार नाही. या विचारापोटी भुतोजी तेली शिखर शिंगणापूरच्या यात्रेला जाण्यापूर्वी आपल्या घरादारास आग लावीत असत. निसंकोच मनाने आणि देवाच्या ओढीने त्यांची कावड द्वादशीलाशिंगणापूरच्या पायथ्याशी पोहचत असे.
दुपार नंतर हि कावड अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून महादेवाच्या डोंगरावर चढत जाते. हे द्रुश्य फारच मोहक असते. सध्या गाड्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवला आहे पण आजही शिखर शिंगणापूरला येणाऱ्या कावडी धोंड्याच्या मुंगी घाटातूनच वर मार्ग काढतात. मानाच्या कावडी मागे इतरही कावडी मार्गस्थ होतात. पूर्वी जेव्हा भुतोजी तेली पौर्णिमेनंतर यात्रा संपवून घरी जात त्यावेळी त्यांचे घर व दार सर्व सुखरूप असे. श्री शंभू महादेवाची लीला अपरंपार आहे. यातच श्री शंभू महादेवाच्या चमत्काराची प्रचीती येते.
सर्व भाविक देवाच्या या विलोभनीय सोहळ्यात मनोभावे सामील होतात. सर्व बांधव एकत्र येऊन देवाचा हा सोहळा उत्तम रीतीने पार पाडतात. तुम्हीही या सोहळ्यात शामिल व्हा आणि देवाचा हा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पहा मगच तुम्हाला श्री शंभू महादेवाच्या अस्तित्वाची खरी प्रचीती येईल.
कावड सोहळा हा अत्यंत नयनरम्य असतो. कावडी चढवत असताना हलगी, तुरे आणि लेझीम याच्या तालावर अनेक भक्तगण आपल्याला नाचताना पाहायला मिळतात. कावड सहा कवड्यांच्या खांद्यावरून नेली जाते. पुढे तीन आणि मागे तीन असे सहा कावडी एक कावड घेऊन शिखर शिंगणापूर वाट पूर्ण करतात. मौज म्हणून कवड्यामध्ये रस्सीखेच खेळली जाते. कावडीतील पाणी नीरा नदीच्या पात्रातून भरून आणले जाते. या सोहळ्यात अनेक जन कावडीचे दर्शन घेतात. लहान मुलांना कावडीच्या खाली झोपवले जाते त्यामुळे लहान मुलास देवाचा आशीर्वाद मिळतो अशी समजूत लोकांमध्ये आहे.
आजही भुतोजी तेली यांचे वंशज कावडी घेऊन शिखर शिंगणापूरच्या यात्रेस येतात. येताना प्रतीकात्मक रूप म्हणून गवताची झोपडी जाळली जाते आणि नंतरच कावड शिखर शिंगणापूरच्या दिशेने चालू लागते. द्वादशीला रात्री बारा वाजता कावडीच्या पाण्याने देवाला अभिषेक केला जातो. त्यानंतर चिमणगाव तालुका कोरेगाव येथील पालखीची मिरवणूक काढण्यात येते. या सोहळ्यानंतर श्री शिखर शिंगणापूरची यात्रा संपते आणि सर्व यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरु होतो. सार्वजन भक्तीत न्हाऊन आपापल्या घरी जातात.
आमदार गणपतराव देशमुख यांचा आदर्श घ्यावा !!!!

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या विविध मुद्द्यांनी गाजत आहे
. मात्र हिवाळी अधिवेशनातील एका फोटोची सध्या मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे. हा फोटो आहे, शेकापचे आमदार देशमुख यांच्या. शेकापाचे आमदार गणपतराव देशमुख वयाच्या ९१ व्या वर्षीही अधिवेनासाठी एसटीने प्रवास करतात, असे या व्हायरल फोटोत म्हटले आहे. एसटीत आमदार, खासदारांसाठी जागा राखीव असते, मात्र याचा वापर झालेला तुम्ही क्वचितच पाहिले असेल. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटणाऱ्या या फोटोची ‘एका वृत्तवाही’ने पडताळणी केली.
गणपतराव देशमुख अधिवेशनासाठी नागपूरला बसने गेले का, याची पडताळणी केली असता असे कळाले की, ते अधिवेशनासाठी ट्रेनने जातात, अशी माहिती मिळाली. मात्र आमदार निवास ते विधानभवन हा प्रवास ते स्वत:च्या गाडीने करत नाहीत. उपलब्ध असलेल्या एसटी किंवा सरकारी वाहनाने ते तेथील प्रवास करतात. इतर आमदार स्वत:च्या गाडीने आमदार निवास ते विधानभवन प्रवास करात.
सांगोल ते नागपूर हे जवळपास ७०० किलोमीटर अंतर आहे. हा प्रवास करण्यासाठी अंदाजे १४ ते १५ तासांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे एखादा त्यामुळे एखादा आमदार इतक्या तासांचा प्रवास बसने करणं कठीण आहे. त्यामुळे हा फोटो कमी अंतराच्या प्रवासानंतरचा असेल. गणपतराव देशमुख आजही अधिवेशनासाठी एसटीने प्रवास करतात, असा दावा व्हायरल फोटोत करण्यात आला आहे. मात्र ते अधिवेशनाच्या काळात आमदार निवास ते विधानभवन प्रवास एसटीने करतात, असं एबीपी माझाच्या पडताळणीतून समोर आलं आहे. नागपूरला ते ट्रेननेच जातात.
#पण_काही_का_असेना_सलाम_या_आमदारसाहेबांना बाकीच्या आमदारांनी यांचा आदर्श घ्यावा
आमचे पेज लाईक करायला विसरू नका JaraHatke
विवाह प्रसंगी कन्येच्या पित्याने केलेले भाषण

लग्न सराईचे दिवस आहेत वाचा जरासा वेळ काढून विवाह_प्रसंगी_कन्येच्या_पित्याने_केलेले_भाषण
" माझ्या मुलीच्या नव्या कुटुंबाला काही सांगण्याचा माझा विचार आहे . पण तसे करणे अयोग्य ठरेल कारण आता तिचे लग्न झालेले आहे आणि ती तुमच्या कुटुंबातील सदस्य बनली आहे . माझ्यावर विश्वास ठेवा , त्याबद्दल माझी कुठलीही त़र्कार नाही . उलट आता माझ्या मुलीचे पहिले प्राधान्य हे तुमचे कुटुंब असले पाहिजे . आता तिच्या आयुष्यात आमची भूमिका मागच्या सीटवर बसून फक्त बघण्याची असेल . आम्ही हे सगळे आनंदाने स्वीकारले आहे . पण आमची एक विनंती आहे . तिला आनंदात ठेवा !
" मला खात्री आहे की , तुम्ही तिला आनंदात ठेवाल . कदाचित ती आमच्यापेक्षा तुमच्याकडे अधिक आनंदी राहील . पण प्रत्येक वडिला प्रमाणेच मला माझी मुलगी आनंदात राहावी असे वाटते . त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की , तिला आनंदात ठेवा .
" ती माझ्यासाठी कधीच ओझे नव्हती . उलट ती माझा श्वास आणि चेहऱ्यावरील हास्य आहे . मी तिचे लग्न करुन देत आहे ; कारण ते सगळे निसर्गनियमानुसार करावेच लागते . आपल्या संस्कृती समोर मी असहाय्य आहे आणि म्हणूनच तुमच्या घरी पाठवत आहे . ती माझ्या घरातील आनंद होती आणि आता तुमच्या घरी प्रकाश देईल , हा माझा तुम्हांला शब्द आहे . रक्त , घाम गाळून मी तिचे पालनपोषन केलेले आहे आणि आता ती परिपूर्ण बनली आहे . आता माझी मुलगी तुमच्या सगळ्यांची काळजी घेईल , सगळ्यावर प्रँम करेल , मायेची ऊब देईल . त्या बदल्यात माझे एकच मागणे आहे - प्लीज तिला आनंदी ठेवा !
" समजा , तुम्हाला कधी वाटले की , माझी मुलगी काही चुकीचे बोलली किंवा तिच्याकडून काही चूक झाली तर तिला रागवायला माझी काहीच हरकत नाही . पण तिच्याशी प्रँमाने वागा . कारण ती खूप नाजूक आहे . जेव्हा तिला निराश वाटेल तेव्हा तिच्या बरोबर राहा . तुमचे तिच्याकडे थोडेफार लक्ष असू द्या . त्याची तिला गरज आहे . ती कधी आजारी पडली तरी तिची काळजी घ्या . कोणती जबाबदारी पार पाडण्यास ती कमी पडली तर तिला खडसावून सांगा . पण तिच्याविषयी सहानुभूती बाळगा . ती अजून शिकते आहे . तिला समजावून घ्या . प्लीज तिला आनंदी ठेवा .
" तिला अनेक महिने भेटता आले नाही , तरी मला काही वाटणार नाही . पण मी रोज एकदातरी तिच्याशी फोनवर बोलल्याशिवाय राहणार नाही . जर तिला माझी आठवण आली नाही , तर माझ्यासारख्या आनंदी मीच असेन . पण माझ्या जगण्याचा केवळ एकमेव उद्देश आहे आणि तो म्हणजे माझ्या मुलीचा आनंद . तो तिला देत राहणे हे आता तुमच्या हाती आहे . मी तुमच्याकडे याचना करतो की , प्लीज तिला आनंदी ठेवा . जावईबापू , हे शब्द तुम्हांला आता फारसे महत्त्वाचे वाटणार नाहीत . पण जेव्हा कधी मुलीचे बाप व्हाल , तेव्हा या शब्दांचे मोल तुम्हांला कळेल . त्या वेळी तुमच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातून आवाज येईल , प्लीज तिला आनंदात ठेवा . "
--- #सर्व_वडिलांसाठी_
#समर्पित
#लेख_आवडल्यास_आमचे_पेज_Like_करा
#आणि_Share_करायला_विसरू_नका
!!!!!! JaraHatke #मराठी_मनाचा_स्वाभिमान !!!!!!
विदेशी पर्यटकांची व्यथा

वाचा_आणि_विचार_करा...
बाई जपान ची, नव्वद हजार खर्च करून हजारो किलोमीटर वरून भारतातील लेण्या पाहण्यासाठी मुंबई ला उतरते. खाजगी बसने अजिंठा वेरूळला पोहचते. सोबत एक हाय रेजुुलेशन कॅमेरा, मॅप, एक आठवडा लेण्यांचा अभ्यास, एक प्रश्नांची यादी अजिंठा वेरूळला येऊन खूप बारकाईने अभ्यास करतात .काही दगडमातीचे नमुने सोबत घेतात लेणी, पहाड, दगडाचे फोटो काढतात. बनवण्याची प्रक्रिया समजुन घेतात.कलाकृतीचे निरिक्षण करतात .
आणि ज्यावेळेेस जपानची बाई लेण्याचे फोटो काढत असते . त्यावेळेस भारतातील मुलं त्या बाईचे फोटो काढ़त असतात. ही बाब त्या बाईला खटकते ती बाई त्या मुलांना समजावून सागते.
he u man,don't capture, I am not culture
(लेण्याकडे बोट दाखवत )
this is culture, u take their photos
पन तरी ते 25,30 वर्षाचे मुलं एेकत नाहीत. आणि म्हणतात मॅम वन फोटो यु एंड मी .........
ती बाई कंटाळुन... ठीक आहे म्हणते आणि मुलं त्या बाईच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढतात .
हे असले प्रकार वेरूळ, गोवा भारतात बर्याच ठिकाणी घडतात.
मग ती बाई जपानला जाऊन तिथल्या लोकाना माहिती देते की,भारतातील कैलास मंदिर जगातलं एकमेव असं मंदीर आहे की जे वरून खाली बांधत आणलेले आहे ,लोणार सरोवर जगातलं उल्कापातानं तयार झालेले एकमेव सरोवर आहे, गोव्याला आंतराष्ट्रीय दर्जाचा समुद्रकिनारा आहे. आणि असं बरच काही,
आणि आपल्या भारतातील मुलं घरी येऊन बाकीच्यांना सागतात की, काय फॉरेनर होते? हा बघ फोटो हा ईथला हा तिथला फोटू, एखादा लेण्याजवळचा फेसबुकला टाकलेला फोटू पाहुन मित्र कमेंट करतो, bro u looking hero फक्त दिसत नाही ते हजारो वर्षापूर्वी तयार झालेली आजच्या इंजीनीअर ला लाजवेल अशी कलाकृती. हा कलाकृतीचा अप्रतिम नमुना जो आपल्या देशाची शान असतो आणि ज़िथे जाउन आपल्यातील काही नमुने दीलच्या पानात A for apple आणी B for ball लिहुन येतात.
त्या मूर्खांना कलाकृतीबद्दल माहिती काय असणार?
कारण इथे इतिहास हा विषय बोरींग समजला जातो, मराठी मध्ये MA करणार्यांना साधी कविता करता येत नाही, आणि आयुष्य AC मध्ये जाणारे ज्यांच्या पायाला माती लागत नाही,ते लोक शेतीवर आणी बिसलरी चे पाणी पिणारे लोक दूष्काळावर शोधनिबंध लिहित आहेत ....
100 रूपयात दिवसभर काम करणारा घाम गाळतो आणि दिवसाला खूर्चिवर बसुन हजारो कमावणारे AC ची मागणी करत आहेत .ही आहे शोकांतिका
अनामिक
#पोस्ट_आवडल्यास_आमचे_पेज_लाईक_करा
#आणि_Share_करायला_विसरू_नका
वेश्या वस्तीतली अनोखी पाळणाघरं

जर एखादया पाळणाघराची वेळ संध्याकाळी ६ ते सकाळी ९.३० असेल तर? काय चमकलात ना. हो ही वेळ आहे पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या उत्कर्ष आणि मोहर या पाळणाघरांची. पुण्यातली बुधवार पेठ म्हटली की, सगळ्यांच्याच भुवया उंचवतात. मग इथं आणि पाळणाघर असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. लैगिंक अत्याचाराला बळी पडलेल्या आणि पर्यायाने वेश्या व्यवसायात उतरलेल्या अनेक महिलांच्या मुलांचे ही पाळणाघरं म्हणजे मोठा आधारवडच आहे. रेड लाईट भागातल्या लहान मुलांची संध्याकाळ ही अनेक जखमांनी भरलेली असते. प्रत्येक रात्री बळी पडणाऱ्या त्यांच्या मातांच्या माथ्यावरचे छप्परही तिच्या मालकीचे नसते. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी व्यवसायात बाधा आणाऱ्या लहान मुलांना अफू देऊन गुंगवणे हा इथं सर्रास चालणारा प्रकार. म्हणुनच या भीषण परिस्थितीतून या मुलांना बाहेर काढण्यासाठी, त्यांच्यावर योग्य संस्कार करण्यासाठी उत्कर्ष आणि मोहर ही दोन्ही पाळणाघर शब्दश: अहोरात्र झटत आहे.
चैतन्य महिला मंडळाच्या माध्यमातून गेली आठ वर्ष याच वस्तीत उत्कर्ष पाळणाघर चालू आहे. दोन वेळचा नाष्टा, दूध आणि रात्रीचे जेवण या मूलांना इथं दिलं जातं. पौष्टिक अन्नाबरोबर चांगले संस्कार आणि शिक्षणाचे धडे इथं ही मुलं गिरवतात. उत्कर्षाच्या अध्यक्षा ज्योती पठानिया यांना आलेले अनुभव अतिशय बोलके आहेत. सुरवातीला स्थानिकांचा रोष पत्कारून कमी जागेतही त्यांनी आपलं कार्य चालूच ठेवलं. ज्योती ताई सांगतात की, संवेदना हरवलेली ही मुलं फार हट्टी आणि शिवीगाळ करणारी असतात. पण पाळणाघरात आल्यानंतर त्यांच्यात फारच सकारात्मक बदल होतो. ७ वर्षांची खातून ने अद्याप शाळेचं तोंड ही पाहेलेलं नाही पण उत्कर्ष पाळणा घरात येऊ लागल्यानंतर खातून मराठी, इंग्रजी कविता आत्मविश्वासाने म्हणते. आठ वर्षांनंतर पाळणा घरातील मुलं त्यांच्या मातांच्या संमतीने वसतिगृहात हलवली जातात. शिवाय ख्रिश्चन मिशनरीज या मुलांना नेण्यासाठी तयार असतात. अशावेळी या मातांचं मतापरिवर्तन करून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम ही ज्योती ताई करतात. गणपती, दसरा, दिवाळी, सुट्ट्यांमध्ये धंद्याच्या मौसमात इथं येणाऱ्या मुलांचं प्रमाण वाढतं अशावेळी त्यांना अपुऱ्या जागेचं आवाहन ही पेलावं लागतं. रात्री पाळणाघर आणि दिवसभर शाळा अशा दिनचर्येच्या माध्यमातून मुलांना शक्य तितके या वातावरणापासून दूर ठेवलं जातं.
गेली १५ वर्ष याच वस्तीत या चिमूकल्यांचं आयुष्य सावरण्याचं काम करणाऱ्या स्वधार संस्थेच्या मोहर पाळणा घराचं कार्य ही उत्तुंग आहे. हे २४ तास चालणारे हे पाळणाघर कितीतरी राहुल, सुहाना,चंदा, आशा, सानियासाठी मोठा आधार बनला आहे. बंगाली, कन्नडी, बांग्लादेशी, नेपाळी अशी कितीतरी मुलं आहेत ज्यांना मराठी भाषा, हिंदी भाषा ही कळत नाही. अशा मुलांना सकस अन्न देऊन त्यांच्यात संस्कारांचं बीज इथं रुजवलं जातं. त्यांना आवश्यक वैद्यकीय सेवा ही पुरवली जाते. मोहर मध्ये गेली १५ वर्ष काम करणाऱ्या लता देवळे ह्या मुलांच्या अम्मी, आई, मम्मी झाल्यात आहेत. लता ताई सांगतात की, १५ वर्षांच्या प्रवासात असंख्य अडचणी आल्या. आजही रोज या वस्त्यांमधून त्या स्वत: फिरतात आणि मुलं गोळा करतात. पण कधी कधी या मुलांच्या माताच मोठ आव्हान बनतात. या मुलांच्या माता दारू पिऊन मध्यरात्री मुलांना घेऊन जाण्यासाठी जेव्हा धिंगाणा करतात तेव्हा त्यांना आवर घालण्यासाठी त्यांना आजूबाजूच्या दादा, भाऊंची मदत घ्यावी लागते.
पटांगणी खेळ, सहल, सण, उत्सव, वाढदिवस साजरे करून मुलांना आंनदी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मुलं बदलली जाणं हे तर नेहमीचेच आहे. दर दोन तीन वर्षांनी या मुलांच्या मातांना इतरत्र हलवले जाते त्यावेळी स्वभाविकच मुलं ही जातात. पण मोहर आणि उत्कर्ष चं कार्य मात्र अखंड आणि निस्वार्थी पणे चालू आहे.
#लेख_आवडल्यास_आमचे_page_like_करा JaraHatke
#आणि_share_करायला_विसरू_नका
काय चुक होती माझी !!!!!!!

#काय_चुक_होती_माझी !!!!!!!
दोन तीन दिवसा पुर्वी वाशीम जिल्ह्य़ात एका वाणराला मारल्याची घटना आपण सोशल मीडिया वर पाहिली अनेक जणांनी photos. Videos Share केले पण आपण विचार केला का त्या मुक्या जिवची काय चुक होती
त्या नराधमांनी ईतक्या निर्दय पणे त्यला मारले ज्याच्या पासुन मानवाचे निर्माण झाले त्यलाच ईतक्या निर्दय पणे मारले त्या प्राण्यांच्या रूपात आपण राम भक्त हनुमानाला पहातो का ही लोक येवढी माणुसकी सोडून वागतात त्या प्राण्याला जिव नाही का
आपल्याला कोणी जर धक्का लावला तर आपण लगेच अंगावर जातो
शेतात आलेल्या या जखमी माकडाची त्यांना थोडीशी ही दया आली नाही बाकी काही नाही पण यातुन हेच समजते की माणसातली क्रुरता किती शिगेला गेलीय आणि हीच शोकांतिका आहे
आशा करूया की त्या नराधमांना जास्तीत जास्त शिक्षा होईल !!!!
आमचे page like करायला विसरू नका JaraHatke
आणि Share ही करा
फळविक्रेता ते 3000 कोटीचा मालक Natural Ice-cream ची यशोगाथा पहा

एका गरीब फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटीची संपत्ती असणाऱ्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक थक्क करणारा प्रवास..!!
नॅचरल आईस्क्रीम ही सर्वाधिक आवडीची आईस्क्रीम म्हणून पाहिल्या जाते. या आईस्क्रीम च्या मागे दडलीय एक थक्क करणारी प्रेरणादायी कहाणी.. कर्नाटक मधील मंगलोर जिल्ह्यातील पतूर तालुक्यातील मुलकी या गावातील रघुनंदन श्रीनिवास कामथ एका गरीब फळ विक्रेत्यांचा मुलगा.
महिन्याला 100 रुपये कमावून त्यात 7 मुलांची कशी तरी गुजराण ते करत होते. रघुनंदन ने अत्यंत हलाखीत दिवस काढले. 15 व्या वर्षी सर्व कामथ कुटुंब कर्नाटक वरून मुंबईला स्थलांतरीत झाले. मुंबईला जुहू कोळीवाड्यातील एका 12 by 12 च्या खोली मध्ये सर्व कुटुंब राहायचे रघुनंदन हा घरातील सर्वात लहान सदस्य असल्याने त्याला कॉट खाली झोपावे लागायचे.
वयाच्या 15 वर्षी मुंबईत सुरुवातीला रघुनंदन यांनी चप्पल विक्रीचा व्यवसाय केला. त्यानंतर त्यांचा मोठा भाऊ जो त्यांच्याहून 20 वर्षांनी मोठा त्याचा उसळ पाव चा व्यवसाय होता त्यातून त्याने व्यवसाय वाढवून गोकुळ रिफ्रेशमेन्ट मार्फत साऊथ इंडियन फूड आणि घरगुती आईस्क्रीम चा व्यवसाय सुरू केला.
रघुनंदन कामथ भावाच्या व्यवसायात भावाला मदत करायचे त्यातून त्यांनी पाहिले की लोकांना आईस्क्रीम जास्त आवडते व ती आवडली तर दुसऱ्यांसोबत शेअर करतात. यातून त्यांना कल्पना सुचली की ग्राहकांना जर फळांचे तुकडे असणारी नैसर्गिक फळापासून बनवलेली आईस्क्रीम कृत्रिम फ्लेवर च्या आईस्क्रीम पेक्षा जास्त आवडेल.
त्यांनी ही आपली कल्पना आपल्या घरच्यांना सांगितली पण कोणीच ती मनावर घेतली नाही. पण रघुनंदन कामथ एका योग्य वेळेची वाट पाहून होते. काही दिवसांनी त्यांच्या पारिवारिक संपत्तीची वाटणी करण्याची वेळ आली तेव्हा इतर भावाप्रमाणे त्यांनी मासिक स्वरूपात रक्कम स्वीकारण्या ऐवजी एकदम एक लाख रुपयांची रक्कम घेतली.
नवीन लग्न झालेल्या रघुनंदन कामथ यांना जाणवले की मुंबई सारख्या शहरात एक लाख रुपयाच्या बीज भांडवलावर व्यवसाय करणे शक्य नाही.याप्रसंगी त्यांची पत्नी अन्नपूर्णा यांनी त्यांना हिम्मत दिली प्रोत्साहन दिले. त्यांनी नातेवाईक आणि मित्रांकडून 3 लाख रुपये जमा करून 1984 साली आईस्क्रिमच्या व्यवसायात उतरले.
जुहू विले पार्ल डेवलपमेंट स्कीम (जेवीपीडीएस) या नावाने 350 स्क्वेअर फूट जागेत पहिले शॉप सुरू केले. रघुनंदन व त्यांची पत्नी यांच्यासह चार कर्मचारी मिळून हे शॉप सुरू केले. पहिल्यांदा 10 फ्लेवर मध्ये आईस्क्रीम बनवली. सुरुवातीला 15 किलो आईस्क्रीम बनवली, ज्यात एका आठवड्यात 1 हजार कप विकले गेले.
सायकल वरून जाऊन ग्राहक जोडण्यासाठी पायपीट करत असत, त्यात ते प्रसिद्ध व्यक्तीच्याकडे जाऊन त्यांना आईसक्रिम वितरित करायचे; यातून बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तीना जोडले. 2 वर्षात त्यांनी 14 लाखाचा व्यवसाय केला.
तिथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही, त्यांची आईस्क्रीम पर्यटकांच्या पण पसंतीला उतरली. आईस्क्रीम साठी लागणारे दूध ते मुंबईतील दर्जेदार दूध समजल्या जाणाऱ्या नोबल डेरी चे दूध घेतात तर साखर ही दर्जेदार फार्मा ग्रेड ची घेतात. वडील फळ विक्रेते असल्याने फळांचे पारखी आहेत. आईस्क्रीम साठी अत्यंत दर्जेदार गोष्टी घेण्याबाबत त्यांचा पूर्वीपासून कटाक्ष आहे.
आज नॅचरल आईस्क्रीमचे देशभरात 125 आऊटलेट आहेत. तर 60 फळापासून 100 हून अधिक फ्लेवरची आईस्क्रीम उत्पादित करतात.आज कंपनीचे 3000 हजार कोटींचे एकूण मूल्य आहे. चारकोप कांदिवली वेस्ट ला त्यांची स्वतःची आईस्क्रीम फॅक्टरी आहे रोज 20 टन आईस्क्रीम बनवली जाते व पॅक करून देशभरात वितरित केली जाते.
तर ही आहे कथा एका गरीब फळ विक्रेत्यांचा मुलगा ते 3000 कोटींची उलाढाल असलेल्या नॅचरल आईस्क्रीमचा मालक रघुनंदन कामथ यांचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास. आवडल्यास अवश्य शेअर करा.
तुकाराम मुंडे यांनी मांडलेलं मत

आय ए_एस तुकाराम मुंडे सर यांनी एका कार्यक्रमात मांडलेले मत
#स्वतःला_पुढे_जायचे_असेल_तर...!
स्वतःआई-वडीललांपासून दूर व्हा....!
किव्हा
पाल्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पालकांनी स्वतः पाल्यांना दूर करा...!
एकदा एका राजाने दोन गरुडाचे पिल्लं आणले. त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर घेतला आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उडवले. लगेच तो आकाशात उंचच उंच झेप घ्यायला लागला, तर दुसरा मात्र आपल्या फांदीवर बसूनच होता. तो उडेचना. हे पाहून राजा फार दुःखी झाला.
त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली, की 'जो कोणी त्याच्या दुसऱ्या गरुडाला आकाशात उडायला लावील. त्याला सुवर्ण मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील.'
हे ऐकून बक्षिसाच्या मोहाने अनेक लोक आले, पण कोणीही गरुडाला उडवू शकले नाही. तेव्हा दवंडी ऐकून एक गरीब शेतकरी राजाकडे आला आणि मी गरुडाला उडवण्याचा प्रयत्न करतो अशी त्याने राजाला विनंती केली. अनेक रथी-महारथी थकले, तिथे हा फाटका काय करणार असा विचार राजाच्या मनात आला, पण गरुड उडणे आवश्यक होते, म्हणून त्याने त्याला संमती दिली.
शेतकरी गरुडाकडे गेला आणि परत आला. राजाने विचारले, "काय रे, उडाला काय गरुड?" तेव्हा शेतकऱ्याने आकाशाकडे बोट दाखवले. राजाने बोटाच्या दिशेने आकाशाकडे बघितले आणि काय आश्चर्य! तो दुसरा गरुड आकाशात पहिल्यापेक्षा उंच भराऱ्या घेत होता. राजा आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला!
त्या धक्क्यातून सावरल्यावर त्याने शेतकऱ्याला विचारले, "अरे, तू हे कसे केलेस?"
तेव्हा शेतकरी म्हणाला, "मी काही फार वेगळं केलं नाही. मी फक्त तो गरुड बसलेला होता, ती फांदी मोडून टाकली! त्याचबरोबर त्याने उंच आकाशात भरारी घेतली!!"
आयुष्यात अनेक जण असेच कोणत्यातरी फांद्यांना चिकटून बसलेले असतात. कोणी त्यांच्या शेती-वाडीला, कोणी परंपरागत व्यवसायाला, तर कोणी छोट्या-मोठ्या नोकऱ्यांना! या छोट्या-मोठया फांद्यांना चिकटून राहून मिळेल त्यावर भागवण्याच्या नादात आपल्यातला गरुडच ते विसरून जात असतात!
मिळेल ती नोकरी धरायची. मग घर घ्यायचं. मुलं झाली की, त्यांचं शिक्षण, मग त्यांचं सेटलमेंट, लग्न, हे सारं करत-करत निवृत्त व्हायचं, बस्स, संपलं आयुष्य! यालाच मध्यमवर्गीय कुपमंडुक मानसिकता म्हणतात!
अरे कधीतरी स्वतःमध्ये डोकावून बघा! आयुष्य म्हणज फक्त इतकंच आहे काय? तुमची फांदी तोडायला कोणीही येणार नाही, हे लक्षात असू द्या. तुम्हाला जर आकाशात उंच उडायचं असेल, तर तुमची तुम्हालाच तोडावी लागेल ती फांदी! कधीतरी स्वतःच तोडून तर बघा! तुम्ही जितकं समजताय ना त्याहूनही अधिक करण्यासारखं खूप आहे हो आयुष्यात! जग खूप मोठं आहे. विशाल आहे, पण तुम्हीच स्वतःला पारंपरिक मध्यमवर्गीय मानसिकतेच्या चार भिंतींमध्ये कोंडून घेतलंय आणि त्याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे त्या चार भिंतींनाच तुम्ही विश्व समजत आहात!
ठीक आहे, तुम्ही जगला आणि जगत असाल असं, पण कृपया तुमच्या मुलांना तरी या फांद्यांना नका बांधून ठेवू! त्यांना तरी उडू द्या स्वच्छंद अन मनसोक्तपणे आकाशात. शक्य झालंच तर तुम्ही मोडून टाका त्यांच्या फांद्या!
मग बघा तुमच्या फांदीवरचा तो पक्षी कसा दिगंतराला जातो...
पोस्ट शेअर करायला विसरु नका कारण आपल्या प्रिय
व्यक्ती सुधारण्यास वैचारिक हातभार मिळेल.
#धन्यवाद..!
विरुष्काच्या रिसेप्शन ला आले पंतप्रधान

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचं दिल्लीमध्ये रिसेप्शन झालं
आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हजेरी लावली आणि दोघांना शुभेच्छा दिल्या.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मानं कालच जाऊन पंतप्रधानांना लग्नाचं आमंत्रण दिलं. या दोघांच्या आमंत्रणाचा मान ठेवून मोदी या सोहळ्याला उपस्थित राहिले. रिसेप्शनच्या आधी विराट आणि अनुष्का माध्यमांसमोर आले.
'विरुष्का'च्या रिसेप्शनसाठी ५०० हून अधिक जणांना आमंत्रित करण्यात आलंय... तर २६ डिसेंबर रोजी मुंबईतही एका पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये अनेक दिग्गज बॉलिवूड स्टार्स उपस्थित होतील.
आज आहे राष्ट्रीय शॆतकरी दिन

आज__आहे_राष्ट्रीय_शॆतकरी_दिन____वाचा__थोडक्यात आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी Share करा
राष्ट्रीय शेतकरी दिवस किंवा किसान दिवस भारताचे पाचवे पंतप्रधान असलेले चौधरी चरण सिंग यांच्या सन्मानार्थ साजरी करण्यात येतात. त्यांनी 28 जुलै 1 9 7 9 पासून 14 जानेवारी 1 9 80 पर्यंतच्या काळासाठी अतिशय लहान कालावधीसाठी पंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली. ते एक अत्यंत साध्या-मर्मज्ञ माणसाचे होते आणि अतिशय सोपी जीवन जगले. पंतप्रधान म्हणून त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी भारतीय शेतक-यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक धोरणे सुरू केली. चौधरी चरणसिंह आणि शेतकर्यांच्या नावे विविध फायदेकारक धोरणाचे चुंबकीय व्यक्तिमत्व, जमीनीदार आणि सावकारांविरुध्द भारतातील सर्व शेतकरी एकत्रित केले. भारत सरकारच्या दुसऱ्या पत्राद्वारे देण्यात आलेल्या जय जय जय किसान नावाच्या प्रसिद्ध नृत्याचे त्यांनी अनुसरण केले. चौधरी चरण सिंह एक अतिशय यशस्वी लेखक होते आणि त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली होती ज्यात त्यांनी शेतकरी आणि त्यांच्या समस्यांवर विचार मांडले; शेतकर्यांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी ते विविध उपायांसह बाहेर आले.
चौधरी चरण शेतकरी कुटुंबातील होते आणि म्हणूनच भारताचे सन्माननीय पंतप्रधान असतानाही त्यांनी अत्यंत साधे जीवन जगले. भारत हे प्रामुख्याने गावांची भूमी आहे आणि गावांमध्ये राहणार्या बहुसंख्य लोकसंख्या शेतकरी आणि शेती ही त्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. 70% भारतीय लोकसंख्या आजही लागवडीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर उभी आहे. भारत एक रोचक शेतीचा प्रवास पाहतो.
पंजाब आणि हरियानात उत्क्रुष्ट झालेल्या 60 व्या दशकात हरितक्रांती देशाची कृषी चित्र बदलली. यामुळे उत्पादनक्षमता वाढली आणि अशाप्रकारे भारत विविध कृषी-उत्पादनांमध्ये स्वयंपूर्ण बनला.
शेतकरी हे भारताची रीती आहेत. देशाच्या शेतकर्यांनी केलेल्या महान कार्याचा सन्मान करण्यासाठी भारत 23 व्या डिसेंबर रोजी दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करतो.
पोस्ट आवडली तर आमचे पेज like करा JaraHatke
स्त्री शक्तीला सलाम

स्त्री शक्तीला सलाम
स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मुर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. पारंपारिकरित्या पुरूषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज करत आहे.
भारतीय तत्वाज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभुत सुविधा व समृध्दी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरूष दैवताची केली जात असली तरी चर्चा होते ती त्यांच्या शक्तीची, त्यांच्या असलेल्या स्त्री शक्तीची.
स्त्री आणि पुरूष यांच्यात केवळ शरीरभेद नाही तर स्त्री अधिक संवेदनशील, श्रध्दावंत आहे, तिला देवत्वाचे अस्तित्व अधिक जाणवते. पुरूषाचे लक्ष्य मात्र भौतिकतेकडे, जडत्वावर अधिकार गाजविण्याकडे अधिक असते.
राजा जनकाच्या राजसभेत याज्ञवलक्याला कसे प्रश्न विचारण्यात आले होते. ते तुम्हाला आठवते का? त्यांना प्रश्न विचारण्यापैकी प्रमुख होती वाचवनवी नामक एक कुमारी मोठी वाक्पटू होती. त्या काळी अशा स्त्रियांना ब्रह्मवादिनी म्हणत. एखाद्या कुशल धनुर्धराच्या हातात चमकणारे दोन बाण असावेत तसे माझे प्रश्न आहेत असे ती म्हणाली. त्या ठिकाणी तिच्या स्त्रीत्वासंबंधी कोणताही प्रश्न उपस्थित केलेला नाही.
तसं पाहता समाजातील स्वतःचे न्यायस्थान जगभरात कुठेही भारतातील महिलांना पुरूषांप्रमाणे उक्ते मिळाले नाही. गेल्या शतकात त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाच्या आणि त्यातून महिलांनी साधलेली प्रगतीचा थोडक्यात प्रवास १९५० मध्ये प्रेम माथुर यांना भारतातील पहिल्या व्यावसायीक महिला वैमानिक होण्याचा मान, १९५२ च्या ऑलिपिंक स्पर्धामध्ये पुरूष व महिलांना एकत्र खेळण्याची संधी, भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, सुचेता कृपलानी यांना भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मान, भारतीय पोलिस सेवेत अधिकारी पदावर किरण बेदी यांची निवड पोलिस सेवेत अधिकारी पदावर दाखल झालेल्या पहिल्या महिला, मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर, भारतीय सैन्य दलात महिलांचा प्रवेश, भारताच्या राष्ट्रपती पदी महिलेची निवड प्रतिभाताई पाटिल, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भारतरत्न किताब, भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५०% आरक्षण.
Subscribe to:
Posts (Atom)